शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

वाघ नदीवर बंधारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:16 AM

राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे .....

ठळक मुद्देप्रकल्प मागणी प्रस्ताव : सिंचन व पाणीटंचाईला मिळणार जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसाठी सिंचन व पाणी टंचाईला नवजीवन मिळणार आहे.आमगाव व सालेकसा तालुक्यातील राज्य सीमेवर वाघनदीमधून जलस्त्रोताचे मोठे साधन आहे. परंतु या नदीवर सिंचनासाठी बंधारे प्रकल्प उभारले नसल्याने सिंचनासाठी वाव नाही. परिणामी मोठे जलस्त्रोत जवळ असून दरवर्षी या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी टंचाई असल्यामुळे शेतकºयांना ओलीत शेतीमध्ये पीक घेण्यापासून वंचित व्हावे लागले आहे.आमगाव तालुक्यातील भौगोलिक परिक्षेत्र ३२१०५.६७ हे. आहे. यात बागाईत सिंचन जमिनीचे क्षेत्र ११८५१ हे. आहे. तर २१९३४.६८ हेक्टर जमीन पिकाखाली आहे. तालुक्यातील जलसिंचनाच्या साधनांमध्ये ३१ कालवे, तलाव ६१ व विहिरी १८०९ यात ११८५१ हेक्टर परिक्षेत्र व्यापले आहे. जलसिंचन स्त्रोतांचे साधने २९७ आहेत. परंतु या जलस्त्रांमध्ये स्थिर सिंचन स्त्रोत नाही. नदी, कालवे यांच्या पात्रातून वाहणारे पाण्यामुळे फक्त काही कालावधीपुरते जलसिंचन होते. परंतु बदलत्या वातावरणात हिवाळा व उन्हाळ्यामध्येच पाणी टंचाईला समोर जावे लागते. तर उपलब्ध जलस्त्रोत कमी पावसामुळे व सिंचन साधनांची उपयोगिता कालबाह्य झाल्यामुळे हे स्त्रोतही सिंचनासाठी उपयोगाचे ठरले नाही. आमगाव-सालेकसा हे तालुके राज्य सीमेवर आहेत. यात आमगाव तालुक्याची लोकसंख्या एकंदरीत एक लाख ५० हजारच्या जवळ पोहोचली आहे.शेतकºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दरवर्षी पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे शेतकºयांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक शेतकरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पीक घेण्यापासून वंचित होतात. त्यामुळे या परिक्षेत्रात मोठ्या सिंचन सुविधेसाठी उपलब्ध असलेल्या वाघनदीवर बंधारा बांधण्याची मागणी आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना मुबलक पाणी, सिंचनासाठी पाणी मिळेल व पाणी टंचाईची समस्या मार्गी लागेल. यासाठी या प्रकल्पाचे प्रारूप प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी तयार केले आहे. सदर प्रकल्पाचा प्रस्ताव शेतकरी व नागरिकांच्या हिताचा असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी लेखी निवेदन शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधारजलस्त्रोत वाहते असल्याने फक्त काही कालावधी पुरते सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. परंतु वर्षातील उर्वरित सलग दहा महिन्याच्या कोरड्या व ओसाड दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळाले नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना आधार मिळू शकेल. या प्रकल्पाचा प्रस्ताव भविष्यात अधिक फलदायी ठरणार आहे. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी द्यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, महारीटोला येथील सरपंच भरतलाल बावनथडे, निर्जला टेंभरे (टाकरी), शोभा मेश्राम (गिरोला), मनोज ब्राम्हणकर (सुपलीपार), सुनील ब्राम्हणकर (भोसा), सुमेंद्र उपराडे (सावंगी), रेखा मच्छिरके (पिपरटोला), भेजलाल पटले (बाम्हणी), आशा बिसेन (ननसरी), खेमराज बावनकर (जामखारी), सुनिता तुरकर (अंजोरा) यांनी पुढाकार घेतला आहे.