शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

आतमध्ये झगमगाट; बाहेर भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:13 IST

ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.

ठळक मुद्देव्यथा मिनी मंत्रालयाची : स्वच्छता पंधरवडा कोणत्या कामाचा? दिव्याखाली अंधार, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.जिल्हा प्रशासनातील ग्रामीण क्षेत्रातील विकासात्मक कामांचा लेखाजोखा, आराखडा, नियोजन व अंमलबजावणी यासारखी महत्वाची कामे जिल्हा परिषद प्रशासन राबवित असते. यात रस्ते, पाणी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय आरोग्य, स्वच्छता यावरही प्रामुख्याने भर दिला जातो. सन २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने योजना राबविण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जावून शौचालय बांधणी असो की स्वच्छतेची जनजागृती याबाबत नेहमी विविध उपक्रम राबविले. यात बहुतांश ठिकाणी यशही लाभले. मात्र ज्या कार्यालयातून या योजनांचा शुभारंभ करण्यात आला त्याच कार्यालयाचा परिसर स्वच्छ नाही.जि.प. परिसरातील बहुतांश नाल्यांवरील आच्छादने काही ठिकाणी फुटलेली असून तर काही ठिकाणी आच्छादने नाहीत. गोळा केलेला पालापाचोळा तिथेच जाळला जातो. मुख्य प्रशासकीय ईमारतीच्या मागील बाजूला असलेल्या प्रसाधन गृहामागील दृश्य किळसवाने आहे. ज्या ठिकाणी सभागृह आहे त्याच्या डावीकडील भागात लघुशंका केली जाते. दुर्गंधीमुळे सभागृहाच्या सौंदर्याला बट लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ‘इन’ प्रवेशद्वाराचा ‘होलपास’ तुटलेला असून लहान लोखंडी दरवाजाही तश्याच स्थितीत आहे.जिल्हा परिषदेच्या आतील बांधकामासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून रूपडे पालटले गेले. तिन्ही मजल्यावरील विविध विभागांसह अधिकारी व पदाधिकाºयांची दालनेही अद्ययावत व सुविधायुक्त आहेत. मात्र जिल्हा परिषदेचा परिसर आजही भकासच दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या पूर्व भागार कित्येक वर्षांपासून पडीक वाहनांचा भंगार आहे. लहान इमारतींच्या काही भितींना तडेही गेले आहेत. जि.प. सभागृह असलेल्या भागाकडील प्रसाधन गृहात शौचालयाचे हाल झाले आहेत. स्लॅबचा सिमेंटी पोपडाही हळूहळू खचत आहे. पाण्याची व्यवस्था उत्तम असली तरी दुर्गंधीची समस्या कायम आहे. जिल्हाभरातील शेकडो नागरिक विविध कामांसाठी या मिनी मंत्रालयात येतात. परंतू जि.प. चा परिसर पाहून मन प्रसन्न वाटावे, असे जाणवत नाही. पान किंवा खर्रा खावून थुंकणाºया महानुभावांचीही येथे कमी नाही. स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी जितकी जिल्हा परिषद प्रशासनाची आहे, तितकीच नागरिकांचीही आहे.स्वच्छता विभागाने लक्ष द्यावे१ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण जनतेसह सर्वांना स्वच्छतेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रयत्नही सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद परिसरातील स्वच्छतेकडेही स्वच्छता विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.