शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

आतमध्ये झगमगाट; बाहेर भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:13 IST

ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.

ठळक मुद्देव्यथा मिनी मंत्रालयाची : स्वच्छता पंधरवडा कोणत्या कामाचा? दिव्याखाली अंधार, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.जिल्हा प्रशासनातील ग्रामीण क्षेत्रातील विकासात्मक कामांचा लेखाजोखा, आराखडा, नियोजन व अंमलबजावणी यासारखी महत्वाची कामे जिल्हा परिषद प्रशासन राबवित असते. यात रस्ते, पाणी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय आरोग्य, स्वच्छता यावरही प्रामुख्याने भर दिला जातो. सन २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने योजना राबविण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जावून शौचालय बांधणी असो की स्वच्छतेची जनजागृती याबाबत नेहमी विविध उपक्रम राबविले. यात बहुतांश ठिकाणी यशही लाभले. मात्र ज्या कार्यालयातून या योजनांचा शुभारंभ करण्यात आला त्याच कार्यालयाचा परिसर स्वच्छ नाही.जि.प. परिसरातील बहुतांश नाल्यांवरील आच्छादने काही ठिकाणी फुटलेली असून तर काही ठिकाणी आच्छादने नाहीत. गोळा केलेला पालापाचोळा तिथेच जाळला जातो. मुख्य प्रशासकीय ईमारतीच्या मागील बाजूला असलेल्या प्रसाधन गृहामागील दृश्य किळसवाने आहे. ज्या ठिकाणी सभागृह आहे त्याच्या डावीकडील भागात लघुशंका केली जाते. दुर्गंधीमुळे सभागृहाच्या सौंदर्याला बट लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ‘इन’ प्रवेशद्वाराचा ‘होलपास’ तुटलेला असून लहान लोखंडी दरवाजाही तश्याच स्थितीत आहे.जिल्हा परिषदेच्या आतील बांधकामासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून रूपडे पालटले गेले. तिन्ही मजल्यावरील विविध विभागांसह अधिकारी व पदाधिकाºयांची दालनेही अद्ययावत व सुविधायुक्त आहेत. मात्र जिल्हा परिषदेचा परिसर आजही भकासच दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या पूर्व भागार कित्येक वर्षांपासून पडीक वाहनांचा भंगार आहे. लहान इमारतींच्या काही भितींना तडेही गेले आहेत. जि.प. सभागृह असलेल्या भागाकडील प्रसाधन गृहात शौचालयाचे हाल झाले आहेत. स्लॅबचा सिमेंटी पोपडाही हळूहळू खचत आहे. पाण्याची व्यवस्था उत्तम असली तरी दुर्गंधीची समस्या कायम आहे. जिल्हाभरातील शेकडो नागरिक विविध कामांसाठी या मिनी मंत्रालयात येतात. परंतू जि.प. चा परिसर पाहून मन प्रसन्न वाटावे, असे जाणवत नाही. पान किंवा खर्रा खावून थुंकणाºया महानुभावांचीही येथे कमी नाही. स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी जितकी जिल्हा परिषद प्रशासनाची आहे, तितकीच नागरिकांचीही आहे.स्वच्छता विभागाने लक्ष द्यावे१ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण जनतेसह सर्वांना स्वच्छतेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रयत्नही सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद परिसरातील स्वच्छतेकडेही स्वच्छता विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.