शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:11 IST

केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांची टीका : काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक दुर्दैर्वी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी परखड टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.सोमवारी सकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरात गांधी चौक येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे,पक्ष नेता शमीम शेख उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, असे स्पष्ट असताना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असा संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. दुदैर्वी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे गणवीर यांनी सांगितले.संचालन अजय गडकरी यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. यावेळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भूषण टेंभूर्णे, अजय गडकरी, मुकुंद साखरकर होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, शंकर राऊत, अमर रगडे, विशाल तिरपुडे, सुनील गिहेपुंजे, प्रभू मोहतुरे, भूमेश्वर महावाडे, शिशिर वंजारी, विलास ढेंगे, दिपक गजभिये, भावना शेंडे, डॉ.विनोद भोयर, अवैश पटेल, सुनंदा बांते, श्रद्धा चाचीरे, अनिता नाग्फासे, सीमा भोंगाडे, आशा भोंगाडे, द्वारकानाथ भोंगाडे, जिवन भजनकर, पृथ्वी तांडेकर,मंगेश हुमणे, विष्णु रणदिवे, भाऊ कातोरे, मुन्ना समरीत, शिवलाल नागपुरे, अजीम खान, सुरेश गोतेफोडे, प्रमोद मानापुरे, कमल साठवणे,नितिन वासनिक, यश भगत, राजू सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, सुद्धमता नंदागवली ,नीलकंठ कायते, सरिता चौरागडे, हेमलता सार्वे, संदीप गायधने, आकाश काकडे, योगेश्वर रोकडे, इम्रान पटेल, मोईस कुरेशी, नाहेद परवेज, मेहमूद खान, नीरज गौर, प्रवीण भोंदे, हिरामण लांजेवार, अंकुश बंकर, किशोर जन्भांधू, रिजवान काजी, प्रदीप बुराडे, ध्यानेश्वर रहांगडाले, राजू वंजारी, स्वाती निमजे, प्रिया खंदारे, निर्मला कापगते, सुनिता कापगते, जागेश्वर बडगे, प्रदीप वाडीभस्मे, अनिल किरणापुरे, श्याम शिवणकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.