शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:11 IST

केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांची टीका : काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक दुर्दैर्वी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी परखड टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.सोमवारी सकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरात गांधी चौक येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे,पक्ष नेता शमीम शेख उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, असे स्पष्ट असताना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असा संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. दुदैर्वी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे गणवीर यांनी सांगितले.संचालन अजय गडकरी यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. यावेळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भूषण टेंभूर्णे, अजय गडकरी, मुकुंद साखरकर होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, शंकर राऊत, अमर रगडे, विशाल तिरपुडे, सुनील गिहेपुंजे, प्रभू मोहतुरे, भूमेश्वर महावाडे, शिशिर वंजारी, विलास ढेंगे, दिपक गजभिये, भावना शेंडे, डॉ.विनोद भोयर, अवैश पटेल, सुनंदा बांते, श्रद्धा चाचीरे, अनिता नाग्फासे, सीमा भोंगाडे, आशा भोंगाडे, द्वारकानाथ भोंगाडे, जिवन भजनकर, पृथ्वी तांडेकर,मंगेश हुमणे, विष्णु रणदिवे, भाऊ कातोरे, मुन्ना समरीत, शिवलाल नागपुरे, अजीम खान, सुरेश गोतेफोडे, प्रमोद मानापुरे, कमल साठवणे,नितिन वासनिक, यश भगत, राजू सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, सुद्धमता नंदागवली ,नीलकंठ कायते, सरिता चौरागडे, हेमलता सार्वे, संदीप गायधने, आकाश काकडे, योगेश्वर रोकडे, इम्रान पटेल, मोईस कुरेशी, नाहेद परवेज, मेहमूद खान, नीरज गौर, प्रवीण भोंदे, हिरामण लांजेवार, अंकुश बंकर, किशोर जन्भांधू, रिजवान काजी, प्रदीप बुराडे, ध्यानेश्वर रहांगडाले, राजू वंजारी, स्वाती निमजे, प्रिया खंदारे, निर्मला कापगते, सुनिता कापगते, जागेश्वर बडगे, प्रदीप वाडीभस्मे, अनिल किरणापुरे, श्याम शिवणकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.