शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:11 IST

केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांची टीका : काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक दुर्दैर्वी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी परखड टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.सोमवारी सकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरात गांधी चौक येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे,पक्ष नेता शमीम शेख उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, असे स्पष्ट असताना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असा संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. दुदैर्वी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे गणवीर यांनी सांगितले.संचालन अजय गडकरी यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. यावेळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भूषण टेंभूर्णे, अजय गडकरी, मुकुंद साखरकर होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, शंकर राऊत, अमर रगडे, विशाल तिरपुडे, सुनील गिहेपुंजे, प्रभू मोहतुरे, भूमेश्वर महावाडे, शिशिर वंजारी, विलास ढेंगे, दिपक गजभिये, भावना शेंडे, डॉ.विनोद भोयर, अवैश पटेल, सुनंदा बांते, श्रद्धा चाचीरे, अनिता नाग्फासे, सीमा भोंगाडे, आशा भोंगाडे, द्वारकानाथ भोंगाडे, जिवन भजनकर, पृथ्वी तांडेकर,मंगेश हुमणे, विष्णु रणदिवे, भाऊ कातोरे, मुन्ना समरीत, शिवलाल नागपुरे, अजीम खान, सुरेश गोतेफोडे, प्रमोद मानापुरे, कमल साठवणे,नितिन वासनिक, यश भगत, राजू सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, सुद्धमता नंदागवली ,नीलकंठ कायते, सरिता चौरागडे, हेमलता सार्वे, संदीप गायधने, आकाश काकडे, योगेश्वर रोकडे, इम्रान पटेल, मोईस कुरेशी, नाहेद परवेज, मेहमूद खान, नीरज गौर, प्रवीण भोंदे, हिरामण लांजेवार, अंकुश बंकर, किशोर जन्भांधू, रिजवान काजी, प्रदीप बुराडे, ध्यानेश्वर रहांगडाले, राजू वंजारी, स्वाती निमजे, प्रिया खंदारे, निर्मला कापगते, सुनिता कापगते, जागेश्वर बडगे, प्रदीप वाडीभस्मे, अनिल किरणापुरे, श्याम शिवणकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.