शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:11 IST

केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांची टीका : काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक दुर्दैर्वी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी परखड टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.सोमवारी सकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरात गांधी चौक येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे,पक्ष नेता शमीम शेख उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, असे स्पष्ट असताना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असा संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. दुदैर्वी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे गणवीर यांनी सांगितले.संचालन अजय गडकरी यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. यावेळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भूषण टेंभूर्णे, अजय गडकरी, मुकुंद साखरकर होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, शंकर राऊत, अमर रगडे, विशाल तिरपुडे, सुनील गिहेपुंजे, प्रभू मोहतुरे, भूमेश्वर महावाडे, शिशिर वंजारी, विलास ढेंगे, दिपक गजभिये, भावना शेंडे, डॉ.विनोद भोयर, अवैश पटेल, सुनंदा बांते, श्रद्धा चाचीरे, अनिता नाग्फासे, सीमा भोंगाडे, आशा भोंगाडे, द्वारकानाथ भोंगाडे, जिवन भजनकर, पृथ्वी तांडेकर,मंगेश हुमणे, विष्णु रणदिवे, भाऊ कातोरे, मुन्ना समरीत, शिवलाल नागपुरे, अजीम खान, सुरेश गोतेफोडे, प्रमोद मानापुरे, कमल साठवणे,नितिन वासनिक, यश भगत, राजू सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, सुद्धमता नंदागवली ,नीलकंठ कायते, सरिता चौरागडे, हेमलता सार्वे, संदीप गायधने, आकाश काकडे, योगेश्वर रोकडे, इम्रान पटेल, मोईस कुरेशी, नाहेद परवेज, मेहमूद खान, नीरज गौर, प्रवीण भोंदे, हिरामण लांजेवार, अंकुश बंकर, किशोर जन्भांधू, रिजवान काजी, प्रदीप बुराडे, ध्यानेश्वर रहांगडाले, राजू वंजारी, स्वाती निमजे, प्रिया खंदारे, निर्मला कापगते, सुनिता कापगते, जागेश्वर बडगे, प्रदीप वाडीभस्मे, अनिल किरणापुरे, श्याम शिवणकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.