शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मनरेगात भंडारा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:13 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करताना मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.

भंडारा पॅटर्न राज्यात लागू : आधार लिंकमध्येही प्रथम, जिओ टॅगिंगमध्ये सर्वात पुढेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करताना मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. मनरेगामध्ये मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वलस्थानी ठरला आहे. जिल्ह्यात ९३.५८ टक्के मजुरीचे विहित वेळेत वाटप करण्यात आले असून वेळेत मजूरी देण्याचा ‘भंडारा पॅटर्न’ राज्यात लागू करण्याच्या सूचना रोहयोचे प्रधान सचिवांनी दिले आहेत.मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची मजूरी वेळेत देण्याचे कायद्यात नमूद आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ९२ टक्के व आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ९३.५८ टक्के मजूरी विहित वेळेत देण्यात आली. या वर्षाअखेर ५५ टक्क्यापेक्षा जास्त मजूरांना वेळेत मजूरी देण्याचे नियोजन करण्यात आले, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यप्रणाली अवलंबिली आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ही कार्यप्रणाली अंमलात आणल्यामुळे प्रत्येक तालुक्यात वेळेत मजुरी देण्यात आली. याची दखल घेत रोहयो सचिवांनी राज्यभर भंडारा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रोहयोचे प्रधान सचिवाकडे भंडारा पॅर्टनचे सादरीकरण करण्यात आले होते.मजुरांना वेळेत मजूरी देण्यासोबतच आधारलिंक करण्यात भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात २ लाख ९० हजार ८६७ सक्रीय मजुरांपैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार सक्रीय मजुरांना आधार प्रणालीद्वारे मजुरी देण्यात आली असून त्याची टक्केवारी ६० आहे. मनरेगा योजनेंअंतर्गत मजुरी देणे हे आधार लिंकद्वारे सुलभ होत असल्याने जास्तीत जास्त मजुरांनी स्वत:चे खाते क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. मनरेगा योजनेत ग्रामीण भागातील महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. भंडारा पंचायत समिती अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी या महिला आहे. त्यामुळे भंडारा तालुका मनरेगा अंमलबजावणीत देश पातळीवर चमकला आहे. मनरेगा सुरू झाल्यापासून जिओ टॅगिंग करण्यामध्येही भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून आतापर्यंत निर्माण झालेल्या २६ हजार ३६८ कामांपैकी २० हजार २६२ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. मनरेगांतर्गत वेळेत मजुरी देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यात येतो. भंडारा जिल्ह्याची माहिती व व्यवस्थापन पध्दत (एम.आय.एस.) जलद ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. मजुरांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते. ग्रामविकास व अंमलबजावणी यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जातो. यामुळे मनरेगाच्या अंमलबजावणीत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल आहे. आता हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असून ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.- सुहास दिवसे,जिल्हाधिकारी भंडारा.