शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:08 AM

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.

ठळक मुद्देउन्हामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.उन्हाच्या वाढत्या झळांचा फटका शेळ्या,मेंढ्या,दूघ उत्पादकांना बसू लागला आहे.गुरांसह, बकऱ्यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात मेंढपाळांची ससेहोलपट होत असून जास्त प्रमाणात बकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन,मेंढपालनावर चालतात.ग्रामीण भागात चरीतार्थाचे साधन म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत.परंतु मुख्यालयी असणारे पयुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाºयांनी उप स्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे ईतर जिल्ह्यातील देखील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील मेंढपाळ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा हे मेंढराचे कळप पुन्हा आपल्या जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली की परत जात असतात.जिल्ह्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात हे कळप चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बीची पीके काढली आहेत. त्यामुळे शेतशिवारे रिकामे झाल्यामुळे मेंढपाळांना चारा काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत अ सल्याने जेथे पाण्याची सोय आहे त्याच भागात हे कळप स्थिरावत आहेत.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी बकऱ्यांना पिण्याचे पाणी व चरण्यासाठी झाडपाला मिळत नसून मेंढपाळांना स्वत:च्या आरोग्यासह आपल्या जितराबांचा प्रश्न सतावतो आहे. मेंढपाळांसोबत स्वत:चे कुटुंब असल्याने चिमुकल्या मुलांचे आरोग्यही बिघडत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून दुर्लक्षीत असणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.उष्माघाताचा पशुधनाला बसतोय फटकाउन्हाच्या वाढलेल्या काहीलीमुळे जिल्ह्यातील पशुधनाला फटका बसत असून वाढत्या तापमानामुळे अनेक पशुपालक धास्तावलेले आहेत.गाई,म्हशी, शेळ्या ,मेंढ्यासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून काही ठिकाणी बकºया उष्माघाताच्या बळी ठरत आहेत. शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेतात बसवलेल्या मेंढ्यांना चारापाण्याच्या शोधार्थ राणावणातच भटकावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने पशूंना वळेवर उपचार मिळत नसल्याने बकºयांसह, मेंढ्यांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :foodअन्न