शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-बालाघाट महामार्ग, पाच वर्षांपासून घोषणेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:54 IST

Bhandara : एकाही कामाला सुरुवात नाही, १०० किमी अंतरचा महामार्ग अडला

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा-बालाघाट या दोन जिल्ह्यांतील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. घोषणेला पाच वर्षे झाले आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याउलट अरुंद असणाऱ्या महामार्गाने अनेक दुचाकी चालकाचा बळी घेतला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग की मृत्यूचा महामार्ग अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

भंडारा-बालाघाट या १०५ किमी अंतरच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग पाच वर्षांपूर्वी घोषित करण्यात आले. राज्याने केंद्राला हस्तांतरण केले नसल्याचे चर्चा आलेल्या होत्या. यामुळे महामार्गाचे कामांना विलंब होत असल्याचे चर्चा पेरण्यात आल्या होत्या.

परंतु महामार्गाची कामे कुठे अडली. हे खऱ्या अर्थाने कुणी सांगितले नाही. महामार्गाच्या चौपदरीकरणाची खरी गोम निदर्शनास आली नाही. महामार्गाचे चौपदरीकरण घोषणेत तीन टप्प्यात मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. यात भंडारा ते तुमसर, तुमसर ते वाराशिवनी, आणि वाराशिवनी ते बालाघाट असे हे टप्पे असले तरी गेल्या पाच वर्षापासून कामाचा ठणठणपार आहे. जागेचे अधिग्रहण अडले आहे. विजेचे खांब थेट महामार्गावर आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडेही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे.

पुलाचे बांधकाम अरुंद झाले आहेत. महामार्ग खड्ड्यात गेला आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी नाक तोंड दाबले जात आहे. केंद्र सरकारकडे राज्य मार्गाचे हस्तांतरण करण्यात आले असल्याने राज्याचा सार्वजनिक बांधकाम महामार्ग दुरुस्तीवरून उदासीनता दाखवीत आहे. पाच वर्ष लोटुनही बांधकामाला प्रारंभ न झाल्याने हा महामार्ग अजुन किती वर्ष असाच विस्तारीकरणाविना खितपत राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मार्गावर वाढली वाहतुकीची वर्दळया मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले. बरेच काही वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे डोळेझाक केले. परिणामतः महामार्गावर खिंडाऱ्या पडल्या. या खिंडाऱ्यात दुचाकी चालक कोसळले. अनेक दुचाकी चालकांचे जीव गेले. अनेक दुचाकी चालकांचे हात पाय तुटले. अनेकांना गंभीर दुखापत झाली. तरीही महामार्गचे कामांना सुरुवात करण्यात आली नाही. महामार्गावर तीन नद्या आडव्या आलेल्या आहे. तिन्ही नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहेत.

समृद्धी महामार्गला भिडणारा राष्ट्रीय महामार्गगोंदियापर्यंत समृद्धी महामार्गचे विस्तार होणार आहे. मोहाडी शहरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे. याच शहरातून भंडारा बालाघाट वेगळ्या दिशेने जाणार आहे. दोन्ही महामार्ग मोहाडी शहरातून जाणार असल्याने व्यापार वाढणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे कामे सुरू होणार असल्याचे कारणावरून महामार्गाचे शेजारी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी नवीन घराचे बांधकाम थांबविले आहेत.

कान्हा किसली अभयारण्याला जोडणाराया महामार्गावर ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ येणार आहे. मध्य प्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला जोडणारा महामार्ग ठरणार आहे. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अपघातावर नियंत्रण येणार आहे

टॅग्स :bhandara-acभंडाराhighwayमहामार्ग