भदाडा पुलाचा वळणमार्ग जीवघेणा
By Admin | Updated: January 10, 2015 00:54 IST2015-01-10T00:54:33+5:302015-01-10T00:54:33+5:30
कऱ्हांडला-विरली (बु.) चे मध्यांतरी असलेले लाखांदूर-पवनी मार्गावरील भदाडा पुलाचे ते वळण अपघाताचे ठिकाण ठरले आहे.

भदाडा पुलाचा वळणमार्ग जीवघेणा
कऱ्हांडला : कऱ्हांडला-विरली (बु.) चे मध्यांतरी असलेले लाखांदूर-पवनी मार्गावरील भदाडा पुलाचे ते वळण अपघाताचे ठिकाण ठरले आहे. त्या वळणावरील पुलाला भदाड्याचा पूल या टोपन नावाने परिसरात ओळख निर्माण झाली आहे. त्या पुलाच्या वळणावर वर्षाकाठी अनेक अपघात होतात. त्या कित्येक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
ज्या वाहन चालकांना ते वळण माहित आहे. ते वाहन चालक आधीच वाहनाचा वेग कमी करुन काळजी पूर्वक पुलाचे वळण ओलांडून सुटकेचा श्वास सोडतात. मात्र ज्या वाहनचालकांना त्या पुलाच्या वळणाची किंचीतही माहिती नसणाऱ्या वाहनचालकाचा अपघात घडण्याचे बहूतेक निश्चित मानले जाते. मोटारसायकल, जीप, ट्रक, ट्रॅक्टर इत्यादी वाहनचालक वळणावरुन मार्ग काढतांनी वाहनासकट पुलाचे खाली कोसळतात किंवा पुलाचे वळण कसेबसे पार केलेच. तर समोरील झाडांना आदळून आपले जीव गमावण्याची वेळ येते.
कित्येकांना किरकोळ तर बहूतेक वाहनचालकाचे अनेक अवयव निकामी झालेले आहेत. त्या पुलाचे वळण कमी व्यासाचे आहे. वाहनचालक सरळ येत असतानी अचानक वळण दिसते.
त्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतो. त्या वळणावरुन मार्ग काढतांनी कित्येक वाहनचालकांची आधीच हिंमत कमी होते.
सणासुदीच्या दिवशी आनंदात भर म्हणून ऐनजॉय करणाऱ्या वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. (वार्ताहर)