शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

खबरदार! धुळवडीत गोंधळ घालाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी धुळवड साजरी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्याचा बेत आखला आहे. मात्र, रस्त्यावर गोंधळ घालून धुळवड साजरी करीत असाल तर सावधान. धुळवडीच्या दिवशी पोलिसांचा सर्वत्र वाॅच राहणार असून जिल्हाभर १४०१ पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.कोरोना संकटामुळे दोन वर्षे घरात बसूनच सण-उत्सव साजरे करावे लागले. होळीचा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी तर रंगांची उधळण केली जाते. मात्र, या सणात अनेक जण मद्य प्राशन करून गोंधळ घालतात. शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणतात. अशा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे. यासोबतच पोलीस नियंत्रण कक्षात चार पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, १३ महिला पोलीस शिपायांसह २९ पोलीस कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज झाला आहे.नागरिकांनी होळी व धुळवड साजरी करताना कुठेही शांतता भंग होणार नाही, दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने होळी साजरी करावी. वाहन मद्यप्राशन करुन चालवू नये, असे आवाहन केले आहे.

धुलिवंदनासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना- कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.- कोरोना संक्रमणामुळे धुळवडीला शक्यतो गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करावा. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलालाची उधळण करताना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

होळी, धुळवड आणि रंगपंचमी आनंदात आणि शांततेत साजरी करावी. कुणीही रस्त्यावर गोंधळ घालू नये. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. धुळवडीला गोंधळ घालणाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.-वसंत जाधव,  जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

वाॅशआऊट मोहिमेत ६२ ठिकाणी धाडी- होळीच्या पर्वात मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात वाॅशआऊट मोहीम राबविण्यात आली. चार दिवसात ६२ ठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर धाडी मारुन ३ लाख ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवनी, अड्याळ, जवाहरनगर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव, तुमसर, सिहोरा, साकोली, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, गोबरवाही, दिघोरी, कारधा, वरठी, करडी या ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. 

 

टॅग्स :Holiहोळी 2022Policeपोलिस