शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

खबरदार! धुळवडीत गोंधळ घालाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी धुळवड साजरी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्याचा बेत आखला आहे. मात्र, रस्त्यावर गोंधळ घालून धुळवड साजरी करीत असाल तर सावधान. धुळवडीच्या दिवशी पोलिसांचा सर्वत्र वाॅच राहणार असून जिल्हाभर १४०१ पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.कोरोना संकटामुळे दोन वर्षे घरात बसूनच सण-उत्सव साजरे करावे लागले. होळीचा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी तर रंगांची उधळण केली जाते. मात्र, या सणात अनेक जण मद्य प्राशन करून गोंधळ घालतात. शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणतात. अशा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे. यासोबतच पोलीस नियंत्रण कक्षात चार पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, १३ महिला पोलीस शिपायांसह २९ पोलीस कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज झाला आहे.नागरिकांनी होळी व धुळवड साजरी करताना कुठेही शांतता भंग होणार नाही, दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने होळी साजरी करावी. वाहन मद्यप्राशन करुन चालवू नये, असे आवाहन केले आहे.

धुलिवंदनासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना- कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.- कोरोना संक्रमणामुळे धुळवडीला शक्यतो गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करावा. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलालाची उधळण करताना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

होळी, धुळवड आणि रंगपंचमी आनंदात आणि शांततेत साजरी करावी. कुणीही रस्त्यावर गोंधळ घालू नये. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. धुळवडीला गोंधळ घालणाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.-वसंत जाधव,  जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

वाॅशआऊट मोहिमेत ६२ ठिकाणी धाडी- होळीच्या पर्वात मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात वाॅशआऊट मोहीम राबविण्यात आली. चार दिवसात ६२ ठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर धाडी मारुन ३ लाख ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवनी, अड्याळ, जवाहरनगर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव, तुमसर, सिहोरा, साकोली, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, गोबरवाही, दिघोरी, कारधा, वरठी, करडी या ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. 

 

टॅग्स :Holiहोळी 2022Policeपोलिस