शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोना संसर्ग काळात रस्त्यावरील पाणीपुरी खाणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे पाणीपुरी. शहर असो की गावखेडे, चौकात पाणीपुरीचा हातठेला लागलेला. कोरोना संसर्गकाळातही पाणीपुरीच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसते. कोरोना नियमांचे पालन तर सोडा, स्वच्छतेचेही विक्रेत्याला वावडे असते. थेट अर्धा हात मटक्यात घालून ग्राहकाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली जाते. जिभेचे चोचले पुरविताना अनेक जण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पवनी तालुक्यातील भेंडाळा घटनेने पाणीपुरीचे वास्तव पुढे आले असले तरी बुधवारी भंडारा शहरातील अनेक स्टाॅलवर गर्दी कायमच होती.पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही. हातात प्लेट घेतली की डोळे मिटून गुपचूप खाणे तेवढे सुरू असते. विक्रेता हातात पुरी घेऊन मटक्यातील पाण्यात थेट बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये टाकतो. कोणताही विक्रेता हँडग्लोजचा वापर करताना दिसत नाही. त्याच हाताने इतर कामे करताना आलेल्या ग्राहकाला पाणीपुरी दिली जाते. येथे ना सॅनिटायझर असते ना विक्रेता मास्क लावलेला असतो.पाणीपुरी तयार करण्यासाठी खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याची नेहमी ओरड होते. पाणीसुद्धा अशुद्ध आणि लगतच्याच हातपंपाचे किंवा प्लास्टीक ड्रममध्ये साठविलेले असते. स्टाॅलवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर दिव्य असते. एका स्टीलच्या ड्रममध्ये पाणी आणि त्यावर एक मग ठेवलेला असतो. कुणीही यावे आणि थेट ड्रममध्ये मग बुडवून पाणी प्यावे अशी अवस्था असते. पुरीमध्ये टाकले जाणारे पाणी आंबट-गोड आणि तिखट असते. अनेकदा बेचव आणि झिनझिन्या आणणारे हे पाणी असते. अशा पाणीपुरीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. परंतु कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार करीत नाही. कोरोना काळ आहे. तो तरी कुठे व्यवसाय करणार? असे माणुसकीचे दर्शन घडवित चूपचाप पाणीपुरी खातात. मात्र, पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने झालेला उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. ७८ जणांना विषबाधा झाली. एका बालिकेचा बळी गेला. 

अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष खाद्यपदार्थ विकण्यापूर्वी स्टाॅलची रीतसर नोंदणी अन्न व प्रशासन विभागात करावी लागते. भंडारा शहरात साधारणत: ५० च्या जवळपास पाणीपुरी विक्रेते आहेत. परंतु यापैकी कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेली नाही. कुणी तक्रार करीत नाही म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागही या स्टाॅलच्या तपासणीसाठी पुढाकार घेत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. आतातर कोरोना संसर्गाचा काळ आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत त्यांना निर्देश देणे गरजेचे आहे. नगरपरिषदेचे पथक कारवाईसाठी शहरात भटकंती करते. परंतु अद्यापपर्यंत अशा पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली नाही. भेंडाळा येथील घटनेनंतर प्रशासन खळबडुन जागे झाले असले तरी अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याने विक्री जोमात सुरु आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या