शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोना संसर्ग काळात रस्त्यावरील पाणीपुरी खाणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे पाणीपुरी. शहर असो की गावखेडे, चौकात पाणीपुरीचा हातठेला लागलेला. कोरोना संसर्गकाळातही पाणीपुरीच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसते. कोरोना नियमांचे पालन तर सोडा, स्वच्छतेचेही विक्रेत्याला वावडे असते. थेट अर्धा हात मटक्यात घालून ग्राहकाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली जाते. जिभेचे चोचले पुरविताना अनेक जण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पवनी तालुक्यातील भेंडाळा घटनेने पाणीपुरीचे वास्तव पुढे आले असले तरी बुधवारी भंडारा शहरातील अनेक स्टाॅलवर गर्दी कायमच होती.पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही. हातात प्लेट घेतली की डोळे मिटून गुपचूप खाणे तेवढे सुरू असते. विक्रेता हातात पुरी घेऊन मटक्यातील पाण्यात थेट बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये टाकतो. कोणताही विक्रेता हँडग्लोजचा वापर करताना दिसत नाही. त्याच हाताने इतर कामे करताना आलेल्या ग्राहकाला पाणीपुरी दिली जाते. येथे ना सॅनिटायझर असते ना विक्रेता मास्क लावलेला असतो.पाणीपुरी तयार करण्यासाठी खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याची नेहमी ओरड होते. पाणीसुद्धा अशुद्ध आणि लगतच्याच हातपंपाचे किंवा प्लास्टीक ड्रममध्ये साठविलेले असते. स्टाॅलवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर दिव्य असते. एका स्टीलच्या ड्रममध्ये पाणी आणि त्यावर एक मग ठेवलेला असतो. कुणीही यावे आणि थेट ड्रममध्ये मग बुडवून पाणी प्यावे अशी अवस्था असते. पुरीमध्ये टाकले जाणारे पाणी आंबट-गोड आणि तिखट असते. अनेकदा बेचव आणि झिनझिन्या आणणारे हे पाणी असते. अशा पाणीपुरीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. परंतु कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार करीत नाही. कोरोना काळ आहे. तो तरी कुठे व्यवसाय करणार? असे माणुसकीचे दर्शन घडवित चूपचाप पाणीपुरी खातात. मात्र, पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने झालेला उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. ७८ जणांना विषबाधा झाली. एका बालिकेचा बळी गेला. 

अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष खाद्यपदार्थ विकण्यापूर्वी स्टाॅलची रीतसर नोंदणी अन्न व प्रशासन विभागात करावी लागते. भंडारा शहरात साधारणत: ५० च्या जवळपास पाणीपुरी विक्रेते आहेत. परंतु यापैकी कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेली नाही. कुणी तक्रार करीत नाही म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागही या स्टाॅलच्या तपासणीसाठी पुढाकार घेत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. आतातर कोरोना संसर्गाचा काळ आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत त्यांना निर्देश देणे गरजेचे आहे. नगरपरिषदेचे पथक कारवाईसाठी शहरात भटकंती करते. परंतु अद्यापपर्यंत अशा पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली नाही. भेंडाळा येथील घटनेनंतर प्रशासन खळबडुन जागे झाले असले तरी अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याने विक्री जोमात सुरु आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या