शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

शेतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

लाखनी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेवर कामाला सुरुवात केली आहे. शेतीच्या विकासासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ...

लाखनी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेवर कामाला सुरुवात केली आहे. शेतीच्या विकासासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त शेतकऱ्यांना योजनेंतर्गत ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. बाजारात जे विकले जाते ते शेतकऱ्याने पिकवावे. या संकल्पनेवर कृषी विभागाने काम करावे, असा प्रयत्न सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर योजना कशी पोहोचविणार, यासाठी आराखडा तयार करावा लागणार आहे.

राज्यातील शेतकरी पायावर उभा राहावा. शासनाची मदत घेण्याची वेळही त्यावर येऊ नये. या भावनेतून शेतकऱ्यांचे हात सदैव बळकट करण्यासाठी कृषी विभागाकडून काम करण्याची अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची आहे. यापुढील काळात गट शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी गोडाऊनची निर्मिती करणे, कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे, प्रक्रिया उद्योग उभे करणे, यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आल्यानंतर, त्या शेतकरी बांधवांचे स्वागतासाठी शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. याची योग्य अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना कृषी विभागास सरकारने दिल्या आहेत. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून, नवनवीन प्रयोग करून कृषी क्षेत्रात क्रांती घडविली आहे. अशा पाच हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांनी शेतीसाठी अवलंबलेले तंत्रज्ञान राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.