शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

अवकाळीचा धानपिकांना फटका; बळीराजा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:20 IST

Bhandara : तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा, बागायतदारांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात गत २४ तासात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा घात केला आहे. अवकाळीने धानपिकाला मोठा फटका बसला असून बागायतदारही अडचणीत आले आहेत. तात्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी होत आहे.

आंधळगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा मागे पडला आहे. एक- दोन महिने जात नाही तर अवकाळी पाऊस येतो. आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना उद्ध्वस्त करून जातो. आता कापणीसाठी तयार होत असलेला उन्हाळी धान अवकाळी पावसाचा तडाख्यात सापडला.

मोहाडी : तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका चांगलाच बसला आहे, रोगराई व अन्य संकटातुन जरी पिकांना वाचविता आले तरी नैसर्गिक आपदापासून शक्य होत नाही, हेच खरे आहे. मोहाडी तालुक्यात जांब, कांद्री, आंधळगाव, धोप, मलिदा, वडेगाव, धुसाळा, काटी, पांढराबॉडी, हरदोली, हिवरा वासेरा व परिसरात शेतातील उन्हाळी धानपीक उद्ध्वस्त केले. वादळ आणि गारपिटीमुळे धनाचे लोंब गळून पडले. या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडे तक्रार केली तरीही पंचनामे करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून होत आहे.

पवनारा: तुमसर तालुक्यात रात्री ७:३० दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेकडो एकरांतील उन्हाळी धान पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गर्रा बघेडा, पवनारा, चिचोली, शेकडो एकरांतील उन्हाळी धान भुईसपाट बघेडा, पवनारा, चिचोली गावातील प्रकार कारली आदी गावांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लागवड करण्यात आली आहे. हंगामात अवकाळी पावसाच्या कहरामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

अशातच मंगळवारी आलेल्या वादळी पाऊस झाल्याने उन्हाळी धान, भाजीपाला, शेतावरील झाडांचे मोठे नुकसान झाल्याने 'आले पीक गेले', अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला. कर्ज फेडायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान व कडपा पाण्याखाली आल्याने धानाचे मोठे नुकसान झाले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सव्र्व्हे केला, मात्र शेतकयांची विमा कंपनी दिशाभूल करून फसवणूक करीत आहे.- रशीद शेख, शेतकरी, पवनारा, 

चुल्हाड (सिहोरा): सिहोरा परिसरात अवकाळी पाऊस, वादळाने मंगळवारी रात्री ८ वाजतापासून भीषण स्वरूप दाखविले. सर्वाधिक फटका बपेरा जिल्हा परिषद गटातील गावांना बसला आहे. या गावातील विजेचा पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असले तरी तो उन्ही धानाचे पीक शेतातच जमीनदोस्त झाले. बहुतांश घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर झाडे उन्मळून पडल्याने काही तास वाहतूक बंद करण्यात आली होती. अवकाळी पाऊस आणि वादळाने रात्री ८ वाजताच्या सुमारास परिसरात तांडव माजविण्यास सुरुवात केली. देवरी देव, सुकळी नकुल, गोंडीटोला, बपेरा गावांच्या शिवारात झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. थेट तारांवर झाडे कोसळल्याने विजेचे खांब अर्ध्यामधून तुटले आहेत. यामुळे रात्री ८ वाजेपासून विजेचा पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली. 

वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्रीपासून वीज वितरण कंपनीची यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागली आहे. गोंडीटोला गावात बहुतांश नागरिकांचे घरांचे छत उडाले आहेत. गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. 

दिवसा उष्णता तर रात्रीला वादळ वाऱ्याचे संकट !

पालांदूर : अवकाळी वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. पालांदूर येथे मंगळवारच्या रात्रीला जोरदार वादळी वाऱ्याने विजेची तार तुटले. त्यामुळे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्री दरम्यान वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केले. रात्री १ वाजता दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाला. दिवसाला उष्णतेच्या लाटेला सामोरे जाऊन रात्रीला वादळवाऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. दिवसाला तापमान ४० च्या घरात पोहोचलेला आहे.

धान कापणी प्रभावित...जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात धान पीक अंतिम टप्यात पोहोचलेला आहे. काही ठिकाणी कापणी मळणीचे नियोजन सुरु असताना अवकाळीने कहर केल्यामुळे धान कापणी, मळणी प्रभावित झाली आहे. फळबागेतील आंबा पिकाचे मोठे नुकसान वादळ वाऱ्यामुळे होत आहे. काढणीला आलेला आंबा जमिनीवर पडून नेस्तनाबूत होत असल्याने फळ बागायतदार संकटात सापडले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्र