शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अवकाळीचा धानपिकांना फटका; बळीराजा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:20 IST

Bhandara : तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा, बागायतदारांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात गत २४ तासात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा घात केला आहे. अवकाळीने धानपिकाला मोठा फटका बसला असून बागायतदारही अडचणीत आले आहेत. तात्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी होत आहे.

आंधळगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा मागे पडला आहे. एक- दोन महिने जात नाही तर अवकाळी पाऊस येतो. आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना उद्ध्वस्त करून जातो. आता कापणीसाठी तयार होत असलेला उन्हाळी धान अवकाळी पावसाचा तडाख्यात सापडला.

मोहाडी : तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका चांगलाच बसला आहे, रोगराई व अन्य संकटातुन जरी पिकांना वाचविता आले तरी नैसर्गिक आपदापासून शक्य होत नाही, हेच खरे आहे. मोहाडी तालुक्यात जांब, कांद्री, आंधळगाव, धोप, मलिदा, वडेगाव, धुसाळा, काटी, पांढराबॉडी, हरदोली, हिवरा वासेरा व परिसरात शेतातील उन्हाळी धानपीक उद्ध्वस्त केले. वादळ आणि गारपिटीमुळे धनाचे लोंब गळून पडले. या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडे तक्रार केली तरीही पंचनामे करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून होत आहे.

पवनारा: तुमसर तालुक्यात रात्री ७:३० दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेकडो एकरांतील उन्हाळी धान पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गर्रा बघेडा, पवनारा, चिचोली, शेकडो एकरांतील उन्हाळी धान भुईसपाट बघेडा, पवनारा, चिचोली गावातील प्रकार कारली आदी गावांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लागवड करण्यात आली आहे. हंगामात अवकाळी पावसाच्या कहरामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

अशातच मंगळवारी आलेल्या वादळी पाऊस झाल्याने उन्हाळी धान, भाजीपाला, शेतावरील झाडांचे मोठे नुकसान झाल्याने 'आले पीक गेले', अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला. कर्ज फेडायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान व कडपा पाण्याखाली आल्याने धानाचे मोठे नुकसान झाले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सव्र्व्हे केला, मात्र शेतकयांची विमा कंपनी दिशाभूल करून फसवणूक करीत आहे.- रशीद शेख, शेतकरी, पवनारा, 

चुल्हाड (सिहोरा): सिहोरा परिसरात अवकाळी पाऊस, वादळाने मंगळवारी रात्री ८ वाजतापासून भीषण स्वरूप दाखविले. सर्वाधिक फटका बपेरा जिल्हा परिषद गटातील गावांना बसला आहे. या गावातील विजेचा पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असले तरी तो उन्ही धानाचे पीक शेतातच जमीनदोस्त झाले. बहुतांश घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर झाडे उन्मळून पडल्याने काही तास वाहतूक बंद करण्यात आली होती. अवकाळी पाऊस आणि वादळाने रात्री ८ वाजताच्या सुमारास परिसरात तांडव माजविण्यास सुरुवात केली. देवरी देव, सुकळी नकुल, गोंडीटोला, बपेरा गावांच्या शिवारात झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. थेट तारांवर झाडे कोसळल्याने विजेचे खांब अर्ध्यामधून तुटले आहेत. यामुळे रात्री ८ वाजेपासून विजेचा पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली. 

वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्रीपासून वीज वितरण कंपनीची यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागली आहे. गोंडीटोला गावात बहुतांश नागरिकांचे घरांचे छत उडाले आहेत. गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. 

दिवसा उष्णता तर रात्रीला वादळ वाऱ्याचे संकट !

पालांदूर : अवकाळी वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. पालांदूर येथे मंगळवारच्या रात्रीला जोरदार वादळी वाऱ्याने विजेची तार तुटले. त्यामुळे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्री दरम्यान वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केले. रात्री १ वाजता दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाला. दिवसाला उष्णतेच्या लाटेला सामोरे जाऊन रात्रीला वादळवाऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. दिवसाला तापमान ४० च्या घरात पोहोचलेला आहे.

धान कापणी प्रभावित...जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात धान पीक अंतिम टप्यात पोहोचलेला आहे. काही ठिकाणी कापणी मळणीचे नियोजन सुरु असताना अवकाळीने कहर केल्यामुळे धान कापणी, मळणी प्रभावित झाली आहे. फळबागेतील आंबा पिकाचे मोठे नुकसान वादळ वाऱ्यामुळे होत आहे. काढणीला आलेला आंबा जमिनीवर पडून नेस्तनाबूत होत असल्याने फळ बागायतदार संकटात सापडले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्र