शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अवकाळीने तीन एकर शेती उद्ध्वस्त; भरपाई १०८० रुपये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:26 IST

Bhandara : शेतकऱ्यांची थट्टा; तीन सदस्यीय पथकाच्या सर्वेक्षणाचा दोष

लोकमत न्यूज नेटवर्क 

चुल्हाड (सिहोरा): गत वर्षात अवकाळी पाऊस झाला. पावसाने धानाचे कडपे ओलेचिंब झाले. पाण्यात धानाचे कडपे भिजल्याने कॉब फुटले. नुकसानग्रस्त धान पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्रिसदस्यीय पथकाच्या सर्वेक्षणाने क्रूर थट्टाच केल्याची बाब निदर्शनास आली आहे. देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे बाबतीत संतापजनक प्रकार घडला आहे. तीन एकर जागेतील धान पिकांचे नुकसानभरपाई १०८० रुपये देण्यात आले आहे. सरासरी त्यांना ९८० रुपयेच प्राप्त झाले आहेत. यात सर्वेक्षण करणारे पथक दोषी आहेत, असा सवालही उपस्थित झालेला आहे. 

राज्य शासनाने अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या त्रिसदस्यीय समितीने शेतकऱ्यांचे धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. प्रत्यक्षात शेतात जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते. देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे तीन एकर आर शेतीतील धानाचे कडपे सडले होते. धानाला कोंब फुटले होते. प्रचंड नुकसान झाले होते. परंतु शासकीय मदत प्राप्त होताना उलटेच झाले आहे. अवकाळी पावसाने धान पिकांचे नुकसान झाल्याचे कारणावरून त्यांचे बचत खात्यात १०८० रुपये प्राप्त झाले आहेत. नुकसानीचा आकडा मोठा असताना मदत आखडती देण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीची आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी आधी शेतकऱ्यांनी केवायसी केले. सेतू केंद्रावर त्यांना १०० रुपयांचा खर्च आलेला आहे. आर्थिक मदत १०८० हजार रुपये देण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्यांचे हातात ९८० रुपयेच प्राप्त झाले आहेत. सर्वेक्षण करताना पारदर्शकता असल्याचे दिसून येत नाहीत.

पुन्हा सर्वेक्षणाचे निर्देशतुमसर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धान पिकांचे नुकसान झाले आहेत, धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहेत. २२ ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत नुकसानग्रस्त धान पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश तहसीलदार मोहन टिकले यांनी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना दिले आहे. • २४ एप्रिल २०२४ चे हे आदेशीत पत्र आहे. २५ एप्रिलपर्यंत कुणीही शेत शिवारात फिरकले नाहीत. उशिरा सर्वेक्षण होत आहे. शेतकऱ्यांना धानाचे पीक सुरक्षित करण्याची घाई राहत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. पारदर्शक पद्धतीने सर्वेक्षण झाले पाहिजे, असा सूर आहे.

तीन एकर शेतीत असणाऱ्या धानाचे पीक सडले होते. अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र आर्थिक मदत फक्त १०८० रुपये देण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. हा शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून न्याय मिळाला नाही. - राजेश अंबुले, शेतकरी, देवरी देव.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीbhandara-acभंडारा