शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आॅटोरिक्षा बंदचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:03 IST

लोकवाहिनी म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आॅटोरिक्षा चालक गुरुवारला नागपूर येथील मोर्चात सहभागी झाल्यामुळे आॅटोअभावी भंडारा शहरात प्रवाशांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देएसटी गर्दीने फुल्ल : वरठी - भंडारा मार्गावर प्रवाशांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/वरठी : लोकवाहिनी म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आॅटोरिक्षा चालक गुरुवारला नागपूर येथील मोर्चात सहभागी झाल्यामुळे आॅटोअभावी भंडारा शहरात प्रवाशांची तारांबळ उडाली. वरठी-भंडारा रेल्वे मार्गावर सर्वाधिक धावणारे आॅटो रिक्षांची वाहतूक ठप्प पडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला.गुरुवारला विधानभवनावर मोर्चात आॅटोरिक्षा चालकांनी सहभाग घेतल्यामुळे वर्दळीने धावणारा रस्ता शांत होता. आॅटो रिक्षावर अवलंबून असणाºया प्रवाशांची गैरसोय झाली. नियमित धावणाऱ्या आॅटो रिक्षा अचानक गायब झाल्यामुळे एसटी हाऊसफुल्ल धावताना दिसल्या. एरव्ही एसटीचा प्रवास पसंत करणाºया प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागला. नोकरी करणारे व कार्यालयीन कामामुळे जिल्हा ठिकाणी प्रवास करणारे बस तथा रेल्वे प्रवाशी मोठ्या प्रमाणात आॅटोरिक्षांचा वापर करतात. शाळेत जाणाºया मुलांनाही अडचणी आल्या. गुरूवार सकाळपासूनच रस्त्यावरून आॅटो रिक्षा गायब असल्यामुळे अनेकांची धांदल उडाली.विदर्भ आॅटोरिक्षा चालक मालक संघाच्यावतीने गुरूवारी विधानभवनवर मोर्चाचे आयोजन केले होते. वरठी चालक मालक संघाचे अध्यक्ष राधेश्याम पडोळे, सचिव अरुण हिरेखन, कोषाध्यक्ष संजय हटवार, सदस्य अजय रामटेके, ज्ञानेश्वर उपथले, कमलेश खरवडे, ज्ञानेश्वर वैद्य व लाला लांजेवार यांच्या नेतृत्वात वरठी-भंडारा मार्गावर धावणाºया आॅटो चालक व मालक आंदोलनात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांची झाली गैरसोयआॅटो रिक्षा बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे नियमित एसटी सवलत पासने प्रवास करणाऱ्या विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेकांना धक्काबुक्की सहन करावी लागली. बसेस फुल्ल असल्यामुळे विध्यार्थ्यांना शाळा वेळापत्रक सांभाळता आले नाही. बसेसच्या तुलनेत वाढलेली गर्दी विध्यार्थ्यांना आज अडचणीची ठरली.मोर्चेकऱ्यांमुळे रेल्वे फुल्लहिवाळी अधिवेशन काळात रेल्वेने नियमित प्रवास करणे म्हणजे डोकेदुखी ठरते. असाच अनुभव सध्या रेल्वे गाड्यांबाबत येत आहे. सकाळच्या सत्रात गोंदियामार्गे नागपूरला पोहोचणाºया सर्व गाड्या मोर्चेकऱ्यांनी हाऊसफुल्ल धावताना दिसत आहेत. अधिवेशन काळात जास्तीत जास्त मोर्चे नेण्याच्या भानगडीत एकाच दिवशी अनेक मोर्चे असल्यामुळे चारही बाजूने प्रवाशाची गर्दी वाढली.प्रवाशांना भुर्दंडभंडारा-वरठी मार्गावर २५० आॅटो रिक्षा धावतात. आज संपामुळे आॅटो रिक्षा नसल्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या साधनांची प्रवास करावा लागला. रेल्वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास दोन किलोमीटर अंतर पायी जाऊन मुख्य मार्गाहून अन्य साधनांच्या मदतीने प्रवास करावा लागला. कधीही न दिसणारी गर्दी मोठ्या प्रमाणात एस टी स्टॅन्डवर दिसत होती. प्रवाशी मिळेल त्या साधनाने व मागेल ती किंमत मोजून गंतव्य स्थान गाठले.