पालांदुरात पाण्याची कृत्रिम टंचाई

By Admin | Updated: June 10, 2014 23:52 IST2014-06-10T23:52:49+5:302014-06-10T23:52:49+5:30

लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे

Artificial scarcity of water in Palanpur | पालांदुरात पाण्याची कृत्रिम टंचाई

पालांदुरात पाण्याची कृत्रिम टंचाई

पालांदूर : लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने पाच दहा नव्हे सव्वा कोटी रुपये देऊनही महिलांना पाण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गावाच्या विकासाकरिता ग्राम पंचायत अत्यंत महत्वाची बाब आहे. स्थानिक समस्यांना तात्काळ मुक्ती मिळण्याकरिता ग्रामपंचायत प्रभावी माध्यम लोकशाहीत प्रथम आहे. गावात चौफेर विकास भेदभाव विरहित साधण् याकरिता ग्रामसभा प्रभावी साधन माध्यम आहे. गावकरी ग्रामसभेत हिरहिरीने भाग नोंदवित पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामपंचायतला महत्वाच्या सूचना दिल्या. मात्र जबाबदारीची जाणीव हरविलेल्या ग्रामपंचायतने ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविली.
पालांदूर गाव सुमारे पाच हजार लोकवस्तीचे आहे. दोन लक्ष लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेले दोन जलकुंभ मिळणाऱ्या आठ तासाच्या विजेवर तुडूंब भरतात. प्रत्येक व्यक्तीला चाळीस लिटर पाणी याप्रमाणे प्रती कुटुंबाला ४०० लिटर पाणी मिळू शकते. मात्र पाणी वाटप यंत्रणेच्या हेकेखोर पणाने कुठे जास्त तर कुठे कमी तर कुठे थेंबही नाही अशी स्थिती पालांदूर नळयोजनेची झाली आहे.
नळाला तोट्याच नाहीत
पालांदूर नळयोजना एक ना अनेक कारणांनी वर्षभर गावात चर्चेत राहते. नळयोजना फसवी राहण्याकरिता नळाला तोट्याच नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. नळाला तोट्या लावल्या पाहिजेत असा फर्मान ग्रामपंचायतने काढून तसा प्रयोग करणे अगत्याचे आहे. पण कृती नसल्याने नळधारकही बेडर झाली आहेत. शेजारच्या खुनारी गावात सरपंच हेमंत सेलोकर यांनी स्वत: पुढे येऊन नयाला परमनंट तोट्या लावल्या. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग टळून समान पाणी वाटपाला मदत झाली.
नव्या नळयोजनेची गरज
पाण्याची तीव्र टंचाईचा मुद्दा लोकमतने प्रामाणिकपणे समोर आपला प्रशासनानेही दखल घेत गावाला भेट देऊन सर्व्हे केला. अभियंता सतीश मारबते जि.प. भंडारा यांच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायतने नवीन पाणी पुरवठा स्त्रोताकरिता मागणी करणे आवश्यक आहे.
तहान लागण्यापूर्वी विहिर खोदणे आवश्यक आहे. आज पालांदूर गावात जर प्रामाणीक प्रयत्न झाले तर किमान पिण्याकरिता तरी पाणी मिळू शकते. मात्र याकरिता नळाला मिटर लावणे, व्हॉल्व दुरुस्त करणे, चढ उतारानुसार पाणी सोडणे, ग्रामसभेच्या सूचनांचे पालन करणे, जुन्या सव्वाकोटीचा हिशेब जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सादर करणे, खोल खड्डे विझविणे आदी कामे केलीत तरच पालांदुरात पिण्याच्या पाण्याचे समान वाटप होऊ शकेल.
ग्राम पंचायत पुढाकार का नाही
समान पाणी वाटपाकरिता येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याकरिता ग्रामसभेचा आधार घेत कारवाई व्हायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी कर्तव्याला न जागल्याने जनतेचा रोष पत्करला आहे.
काही सदस्य खड्डे बुजविण्यावर ठाम आहेत तसा ठराव सुद्धा झाला आहे. पण कही सदस्य राजकीय दबावाखाली असल्याने मागे बोलतात पण पुढे होताना दिसत नाही.
पालांदूर ग्रामपंचायत सदस्यांना स्वत:च्या प्रभागातील पाणी समस्यासुद्धा अवगत नाही. प्रभागात फिरकत सुद्धा नाही. एकंदरीत समान पाणी वाटपाकरिता ग्रामपंचायत पुढाकार का घेत नाही, हा प्रश्न गाववासीयांसाठी अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Artificial scarcity of water in Palanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.