शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१३२.५४ कोटींच्या प्रारुपाला मंजुरी

By admin | Updated: January 8, 2016 00:46 IST

जिल्हा वार्षिक योजनेमध्ये प्राप्त निधी हा सर्व सामान्य नागरिकांच्या करातून मिळालेला आहे. त्यामुळे हा निधी जनतेच्या विकासासाठीच खर्च करावा.

नियोजन समितीची सभा : मार्चपर्यंत निधी खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशभंडारा : जिल्हा वार्षिक योजनेमध्ये प्राप्त निधी हा सर्व सामान्य नागरिकांच्या करातून मिळालेला आहे. त्यामुळे हा निधी जनतेच्या विकासासाठीच खर्च करावा. मोठया प्रमाणात अखर्चित राहिलेला निधी मार्चपर्यंत खर्च करावा, असे निर्देश जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात प्रस्ताव कसे सादर करावे, यासंदर्भात अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. योजनांचे कामे घेतांना त्या-त्या क्षेत्रातील आमदारांशी चर्चा करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत ६.९७ कोटी रूपयांच्या पुर्नविनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. हा निधी कुक्कुट पालन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व दुरुस्ती, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, मत्स्यबीज उत्पादन, रेशिम उत्पादन, व्यायामशाळा व क्रिडांगण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, नागरी दलित्तेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, १०१ ते २५० हेक्टरपर्यंतच्या योजनांचे सर्वेक्षण, यात्रास्थळांचा विकास आदी बाबींसाठी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय २०१६-१७ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखडयास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. सन २०१६-१७ साठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ३००.२४ कोटी रूपयांचे प्रस्ताव सादर केले. भंडारा जिल्ह्यासाठी शासनाची मर्यादा १३२.५४ कोटी रूपयांची आहे. त्यामुळे उर्वरित निधीची मागणी राज्यस्तरीय बैठकीमध्ये वित्त व नियोजन मंत्र्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. या आराखडयामध्ये सर्व साधारण योजनेसाठी ७५.१७ कोटी रूपये, अनुसूचित जाती उपयोजना ४३.७१ कोटी रूपये आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्यसाठी १३.६६ कोटी रूपयांचा समावेश आहे. नाविन्यपूर्ण योजनेमध्ये न्यायालय परिसरात आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बायोमेट्रीक मशिन बसविणे, दुषित स्त्रोत असलेल्या गावामध्ये पाणी शुध्दीकरण यंत्र बसविणे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र प्रत्येक तालुक्यात सुरु करणे, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालयांसाठी अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्र खरेदी करणे आदी कामासाठी २.८० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.१२ मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी २ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. किटाळी येथील बालाजी किल्ला व शिवमंदिर या स्थळाला यात्रा व तिर्थस्थळातून वगळून पर्यटन स्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. २०१५-१६ साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९३.७३ कोटी रूपयांपैकी ४२.३४ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. त्यामुळे अखर्चित राहिलेला निधी मार्चपर्यंत खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बिसेन सयाम, कविता भोंगाडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डी.एन. धारगावे, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी मडावी, विभाग प्रमुख उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)