शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोना संचारबंदीमुळे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. ...

अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. मात्र यावर्षी कोरोना संकटाने सर्व काही ठप्प केले आहे. विवाह सोहळेही रद्द करण्याची वेळ आणली आहे. भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशनचे हेमंत वाघमारे म्हणाले, दोन वर्षापूर्वीपर्यंत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धूमधडाक्यात लग्न होत होते. बुकिंगसाठी चढाओढ दिसत होती. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटाने बुकिंग अगदी कमी झाली. त्यात अनेकांनी घरगुती लग्नसोहळे पार पाडले. यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तासाठी हेमंत सेलिब्रेशनकडे चार लग्नाचे बुकिंग होते. दोन सकाळी आणि दोन संध्याकाळी सोहळे पार पाडणार होते. महिनाभरापूर्वी बुकिंग झाले होते. परंतु कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे चारही लग्न रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे येथे ७ जूनपर्यंत असलेले लग्नाचे सर्व बुकिंग रद्द करण्यात आले.

खरबी (नाका) येथील स्वीट ॲन्ड लव्ह सेलिब्रेशनमध्ये सहा वर्षात अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला लग्न झाले नाही, असे घडले नाही. गत वर्षीही कोरोना संसर्गातही एक लग्न सोहळा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पार पडला होता. यावर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी सहा परिवारांना चौकशी केली. त्यापैकी दोन सोहळे बुकही झाले होते. परंतु कोरोनाच्या उद्रेकाने या दोन्ही परिवारांनी सध्या लग्न नको म्हणून बुकींग रद्द केल्याची माहिती संचालक विकी गिरीपुंजे यांनी दिली.

तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब तेढे यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिली नाही. एक लग्नसोहळा ३ मे रोजी पार पडला आणि एक १३ मे रोजी आयोजित आहे, असे सांगितले. साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे म्हणाले आमच्याकडे अर्ज आले होते. परंतु अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतले नाही. त्यामुळे मंजुरीचा प्रश्न नाही. नागरिकांनी विनापरवानगी घरगुती पद्धतीने लग्न केले तर ते स्वत: जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाचे सचिन खरकटे म्हणाले, मे महिन्यात बुकींग आली नाही. अक्षयतृतीयेला लग्न करण्याच्या आनंदावर कोरोनाने विरजन घातले. घरगुती पद्धतीने लग्न करणेही अनेकांनी पुढे ढकलले आहे.

बॉक्स

२५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न कसे शक्य

गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. परतु यावर्षी शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली. २५ पाहुण्यात लग्न एकदाचे होईलही परंतु दोन तासात लग्न कसे शक्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जाचक अटीपेक्षा कोरोना संसर्ग संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय अनेक परिवारांनी घेतला. त्यामुळेच उन्हाळ्यातील लग्नसोहळे रद्द झाल्याचे दिसत आहे.