शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोना संचारबंदीमुळे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. ...

अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. मात्र यावर्षी कोरोना संकटाने सर्व काही ठप्प केले आहे. विवाह सोहळेही रद्द करण्याची वेळ आणली आहे. भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशनचे हेमंत वाघमारे म्हणाले, दोन वर्षापूर्वीपर्यंत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धूमधडाक्यात लग्न होत होते. बुकिंगसाठी चढाओढ दिसत होती. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटाने बुकिंग अगदी कमी झाली. त्यात अनेकांनी घरगुती लग्नसोहळे पार पाडले. यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तासाठी हेमंत सेलिब्रेशनकडे चार लग्नाचे बुकिंग होते. दोन सकाळी आणि दोन संध्याकाळी सोहळे पार पाडणार होते. महिनाभरापूर्वी बुकिंग झाले होते. परंतु कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे चारही लग्न रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे येथे ७ जूनपर्यंत असलेले लग्नाचे सर्व बुकिंग रद्द करण्यात आले.

खरबी (नाका) येथील स्वीट ॲन्ड लव्ह सेलिब्रेशनमध्ये सहा वर्षात अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला लग्न झाले नाही, असे घडले नाही. गत वर्षीही कोरोना संसर्गातही एक लग्न सोहळा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पार पडला होता. यावर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी सहा परिवारांना चौकशी केली. त्यापैकी दोन सोहळे बुकही झाले होते. परंतु कोरोनाच्या उद्रेकाने या दोन्ही परिवारांनी सध्या लग्न नको म्हणून बुकींग रद्द केल्याची माहिती संचालक विकी गिरीपुंजे यांनी दिली.

तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब तेढे यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिली नाही. एक लग्नसोहळा ३ मे रोजी पार पडला आणि एक १३ मे रोजी आयोजित आहे, असे सांगितले. साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे म्हणाले आमच्याकडे अर्ज आले होते. परंतु अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतले नाही. त्यामुळे मंजुरीचा प्रश्न नाही. नागरिकांनी विनापरवानगी घरगुती पद्धतीने लग्न केले तर ते स्वत: जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाचे सचिन खरकटे म्हणाले, मे महिन्यात बुकींग आली नाही. अक्षयतृतीयेला लग्न करण्याच्या आनंदावर कोरोनाने विरजन घातले. घरगुती पद्धतीने लग्न करणेही अनेकांनी पुढे ढकलले आहे.

बॉक्स

२५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न कसे शक्य

गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. परतु यावर्षी शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली. २५ पाहुण्यात लग्न एकदाचे होईलही परंतु दोन तासात लग्न कसे शक्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जाचक अटीपेक्षा कोरोना संसर्ग संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय अनेक परिवारांनी घेतला. त्यामुळेच उन्हाळ्यातील लग्नसोहळे रद्द झाल्याचे दिसत आहे.