शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अख्खा डांबरी रस्ता मातीमोल

By admin | Updated: February 18, 2017 00:20 IST

शिर्षक वाचून नवल वाटावे असे काहीच नाही. ग्रामीण भागाचे रस्ते खड्ड्यांचे किंबहूना मृत्यू मार्ग अधिक आहेत.

लोकप्रतिनिधी गप्प : खड्ड्याचे रस्ते, वाहनधारकांना त्रासमोहाडी : शिर्षक वाचून नवल वाटावे असे काहीच नाही. ग्रामीण भागाचे रस्ते खड्ड्यांचे किंबहूना मृत्यू मार्ग अधिक आहेत. बोथली-पांजरा ते दाभा हा डांबरी रस्ता तर मातीत एकजीव झाला आहे. ‘अच्छे दिन’ आणणारे नेते गप्प कसे? ग्रामीण भागातील रस्त्यांना कधी ‘अच्छे दिन’ येतील याची प्रतीक्षा जनता करीत आहे.ज्या वाहनधानकांनी दाभा- पांजरा ते बोथली मार्गाने प्रवास केला त्यांना वरील शिर्षकाचा वास्तविक अनुभव आला असेल. पांजरा ते दाभा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्या रस्त्याने वाहतूक वाढली होती. पेट्रोल, डिझेल इंधनची बचत करण्यासाठी दोन व चारचाकी वाहने या रस्त्याने धावू लागली होती. पांजरा रस्ता भंडाराकडे जाण्यासाठी कमी अंतराचा पडतो. प्रवाशांसाठी तो रस्ता सुलभ आहे. पण, या रस्त्यावर ‘ओव्हरलोड’ रेतीचे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असल्याने डांबर मातीत मिसळला. डांबरी रस्त्याची ऐसीतैसी झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. संपूर्ण डांबरी रस्ता मातीत मिसळून गेलेला आहेत. दोनचाकी गाड्या पांजरा-दाभा रस्त्याने क्वचीतच धावताना दिसतात. बोथली ते पांजरा रस्ता अजूनही डांबरीकरणाची प्रतिक्षा करीत आहे. खडीकरण झालेला रस्ता पूर्णत: उखडला आहे. काही जागची खडी कुढे गेली याचा शोध घ्यावा लागतो. रस्ता रेतीमय झाला. या मार्गाने जाण्यासाठी पर्याय नाही, ज्यांना खड््यातून वाहन चालविण्याची हौस आहे असेच व्यक्ती या मार्गाने ये-जा करतात. नविन व्यक्ती एकदा बोथली ते दाभा या मार्गावरुन वाहनाने प्रवास केला तर दुसऱ्यांदा जाण्यासाठी नक्कीच तयार होणार नाही, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.मोहाडीच्या पश्चिमेस एक रस्ता मोरगाव-महालगाव- कान्हळगाव, दुसरा चौंडेश्वरी ते कान्हळगाव हे तीनही मार्ग-अतिशय खराब झाले आहेत. पावलो पावली डांबरी रस्त्यांना खड्डेच खड्डे पडले आहेत. प्रवाशांसाठी हा मृत्यूमार्ग तयार झाला आहे. पश्चिमेकडील वर्दळीचे २५-३० गावांना जोडणारे हे तीन मार्ग पक्की दुरुस्तीची वाट बघत आहेत. अपघातासाठी सज्ज झालेले रस्त्याचे खड्डे तीन दशकातपासून दुरुस्तीची प्रतिक्षा करीत ओहत. तीस वर्षात या रस्त्याने बघितली नाही. दहेगावपासून रोहणा, रोहणा ते बेटाळा, रोहणा ते इंदूरखा या रस्त्याचेही तेच हाल आहेत. कान्हळगाव-पिंपळगाव रस्ताही डांबरीकरणाची वेळ कधी येते याची वाट बघत आहे. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजू पून्हा खोदले जातात. पून्हा तयार केले जातात. रस्त्यांच्या दोन्ही बाजूना मुरुम घालण्यात येतो. त्या रस्त्यावरचा मुरुम महिन्याभरात कुठे जातो याचा शोध घ्यावा लागतो. दरवर्षी राज्य मार्गाच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्ची घालण्यात येतात, पण एक वर्षात पून्हा तिच स्थिती कशी तयार होते. राज्य मार्गावरचे खड्डे पडणे, कडेला मुरुम घालणे ही ठेकेदारांना व अधिका-यांना संपन्न करण्याची पर्वणी ठरते. पण ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांना तीस तीस वर्ष डांबरीकरणाची दुरुस्ती करण्यासाठी सुर्योदय होत नाही.(तालुका प्रतिनिधी)