सिहोरा ग्रामपंचायतवर आयटकचा मोर्चा
By Admin | Updated: January 13, 2015 22:55 IST2015-01-13T22:55:17+5:302015-01-13T22:55:17+5:30
ग्रामपंचायत सिहोरा येथे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्त्याची थकबाकी देण्यात आली नाही. या व अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी

सिहोरा ग्रामपंचायतवर आयटकचा मोर्चा
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायत सिहोरा येथे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्त्याची थकबाकी देण्यात आली नाही. या व अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने सिहोरा येथे मंगळवारला काढण्यात आला.
ग्रामपंचायत सिहोरा येथे लिपीक पदावर माधोराव हेडाऊ आणि करवसुलक म्ळणून रामलाल बिसने सेवेत कार्यरत होते. एप्रिल २०१४ च्या कालावधीत हे दोन्ही कर्मचारी सेवानिवृत्त झाले. दरम्यान शासनाने २००७ पासून राहणीमानभत्ता लागू केला असताना सेवानिवृत्तीनंतर ग्रामपंचायत मार्फत भत्त्याची थकबाकी दोन्ही कर्मचाऱ्यांना दिली नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची पाळी आली. राहणीमान भत्ता व अन्य भत्त्यावर थकबाकी प्राप्त करण्यासाठी दोन्ही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदपर्यंत पत्र व्यवहारातून धाव घेतली.
अन्याय करण्यात येत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने ग्रामपंचायत भवन येथे शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सिहोरा परिसरातील ग्रामपंचायतचे कर्मचारी सहभागी झाले होते. निवेदन सभापती कलाम शेख, सरपंच नेहा कुंभारे, नंदुरकर, ग्रामविकास अधिकारी एच.एम. पडोळे, सदस्य सलाम शेख, मनोज वासनिक, वनिता मसराम यांना देण्यात आले.
या मोर्चात एस.बी. मोहारे, ओंकार शरणागत, मुरलीधर उरकुडे, भिमराव गजभिये, अन्नु कटरे, खेमराज शरणागत, छत्रशिल वाघाडे, रामदास कानतोडे, गयाराम चौधरी, भिमराव गजभिये, कवळू सातके, विजय बर्वे, राकेश गजभिये, गणेश आंबेडारे सहभागी झाले. (वार्ताहर)