शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
4
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
5
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
6
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
7
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
8
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
9
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
10
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
11
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
12
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
13
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
14
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
15
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
16
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
17
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
18
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
19
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
20
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

४० वर्षानंतरही रामपुरी जलाशय दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे.

ठळक मुद्देगेट, सांडवा, कालव्यांची कामे अपूर्ण : २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रामपुरी जलाशयाची १९७४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत निर्मिती आहे. जलाशयाच्या मालकीच्या संभ्रमातून पाटबंधारे विभागाने पाठ फिरविल्याने कालवा बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करून बांधकाम पुर्णत्वास नेले नाही. देखभाल दुरूस्तीअभावी गेट आणि सांडव्याची वाताहत झाली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाची सोय झालेली नाही. त्यामुळे नियोजित गावांमधील शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे.लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे. तत्कालीन परिस्थितीनुरूप पाटबंधारे विभागाने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी गेट आणि सांडव्याचे बांधकाम करण्यात आले. रामपूरी जलाशयापासून मुरमाडी तुप. परिसरातील रामपूरी, सोनमाळा, डोंगरगाव, मुरमाडी, झरप, कोलारा, दिघोरी, नान्होरी, कन्हाळगाव या गावातील २५०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करण्यात येणार होती.पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या सर्वेक्षणानुसार शेतकºयांकडून शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही भाग वनव्याप्त असल्यामुळे वनकायद्याचा अडसर तत्कालीन मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यादवराव पडोळे यांच्या मार्फतीने दूर करण्यात आला होता.जलाशयावरील मालकीबाबत संभ्रमपाटबंधारे विभागाने १०० हेक्टर साठवण क्षमता असलेला जलाशय निर्माण केला असला तरी शासनाने २००८ च्या कायद्यान्वये ही क्षमता केलेले जलाशय जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. या जलाशयावर मालकी कुणाची हा संभ्रम असल्यामुळे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचण होत आहे.विविध बांधकाम पूर्ण होणे गरजेचेरामपूरी जलाशयाची पाळ ४५ वर्षापूर्वी तयार करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी छिद्र पडून गळती लागल्याने पाणी वाहून जाते. देखभाल दुरूस्तीअभावी गेट व सांडवा नादुरूस्त आहे. नहराचे कामे अपूर्ण आहे. पाळीचे मजबुतीकरण, नवीन गेट आणि सांडवा तयार करणे तथा नहराचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण झाल्यास मत्स्य व्यवसाय तथा शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेल.

टॅग्स :water shortageपाणीकपात