शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

४० वर्षानंतरही रामपुरी जलाशय दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे.

ठळक मुद्देगेट, सांडवा, कालव्यांची कामे अपूर्ण : २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रामपुरी जलाशयाची १९७४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत निर्मिती आहे. जलाशयाच्या मालकीच्या संभ्रमातून पाटबंधारे विभागाने पाठ फिरविल्याने कालवा बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करून बांधकाम पुर्णत्वास नेले नाही. देखभाल दुरूस्तीअभावी गेट आणि सांडव्याची वाताहत झाली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाची सोय झालेली नाही. त्यामुळे नियोजित गावांमधील शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे.लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे. तत्कालीन परिस्थितीनुरूप पाटबंधारे विभागाने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी गेट आणि सांडव्याचे बांधकाम करण्यात आले. रामपूरी जलाशयापासून मुरमाडी तुप. परिसरातील रामपूरी, सोनमाळा, डोंगरगाव, मुरमाडी, झरप, कोलारा, दिघोरी, नान्होरी, कन्हाळगाव या गावातील २५०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करण्यात येणार होती.पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या सर्वेक्षणानुसार शेतकºयांकडून शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही भाग वनव्याप्त असल्यामुळे वनकायद्याचा अडसर तत्कालीन मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यादवराव पडोळे यांच्या मार्फतीने दूर करण्यात आला होता.जलाशयावरील मालकीबाबत संभ्रमपाटबंधारे विभागाने १०० हेक्टर साठवण क्षमता असलेला जलाशय निर्माण केला असला तरी शासनाने २००८ च्या कायद्यान्वये ही क्षमता केलेले जलाशय जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. या जलाशयावर मालकी कुणाची हा संभ्रम असल्यामुळे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचण होत आहे.विविध बांधकाम पूर्ण होणे गरजेचेरामपूरी जलाशयाची पाळ ४५ वर्षापूर्वी तयार करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी छिद्र पडून गळती लागल्याने पाणी वाहून जाते. देखभाल दुरूस्तीअभावी गेट व सांडवा नादुरूस्त आहे. नहराचे कामे अपूर्ण आहे. पाळीचे मजबुतीकरण, नवीन गेट आणि सांडवा तयार करणे तथा नहराचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण झाल्यास मत्स्य व्यवसाय तथा शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेल.

टॅग्स :water shortageपाणीकपात