शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षानंतरही रामपुरी जलाशय दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे.

ठळक मुद्देगेट, सांडवा, कालव्यांची कामे अपूर्ण : २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रामपुरी जलाशयाची १९७४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत निर्मिती आहे. जलाशयाच्या मालकीच्या संभ्रमातून पाटबंधारे विभागाने पाठ फिरविल्याने कालवा बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करून बांधकाम पुर्णत्वास नेले नाही. देखभाल दुरूस्तीअभावी गेट आणि सांडव्याची वाताहत झाली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाची सोय झालेली नाही. त्यामुळे नियोजित गावांमधील शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे.लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे. तत्कालीन परिस्थितीनुरूप पाटबंधारे विभागाने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी गेट आणि सांडव्याचे बांधकाम करण्यात आले. रामपूरी जलाशयापासून मुरमाडी तुप. परिसरातील रामपूरी, सोनमाळा, डोंगरगाव, मुरमाडी, झरप, कोलारा, दिघोरी, नान्होरी, कन्हाळगाव या गावातील २५०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करण्यात येणार होती.पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या सर्वेक्षणानुसार शेतकºयांकडून शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही भाग वनव्याप्त असल्यामुळे वनकायद्याचा अडसर तत्कालीन मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यादवराव पडोळे यांच्या मार्फतीने दूर करण्यात आला होता.जलाशयावरील मालकीबाबत संभ्रमपाटबंधारे विभागाने १०० हेक्टर साठवण क्षमता असलेला जलाशय निर्माण केला असला तरी शासनाने २००८ च्या कायद्यान्वये ही क्षमता केलेले जलाशय जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. या जलाशयावर मालकी कुणाची हा संभ्रम असल्यामुळे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचण होत आहे.विविध बांधकाम पूर्ण होणे गरजेचेरामपूरी जलाशयाची पाळ ४५ वर्षापूर्वी तयार करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी छिद्र पडून गळती लागल्याने पाणी वाहून जाते. देखभाल दुरूस्तीअभावी गेट व सांडवा नादुरूस्त आहे. नहराचे कामे अपूर्ण आहे. पाळीचे मजबुतीकरण, नवीन गेट आणि सांडवा तयार करणे तथा नहराचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण झाल्यास मत्स्य व्यवसाय तथा शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेल.

टॅग्स :water shortageपाणीकपात