शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:35 IST

आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । तुमसरमध्ये २० वर्षांपासून प्रतीक्षा, कोट्यवधींच्या निधीचा भाड्यातच चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे. आतापर्यंत भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा झाला आहे.तुमसर तालुक्यात ४५ गावे आदिवासी बहुल आहेत. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तो उच्चांक आहे. शहरात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह १९९९ मध्ये शासनाने सुरु केले. गत २० वर्षापासून ते भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. आतापर्यंत लाखो रुपये भाड्यापोटी देण्यात आले आहे. आठव्या वर्गापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांची व्यवस्था या वसतिगृहात करण्यात आली आहे. मुलींच्या वसतिगृहाचे काम २०१८ मध्ये पूर्ण झाले. नवीन इमारतीत वसतिगृह हलविण्यात आले. सुमारे ४ कोटींची वसतिगृहाची इमारत शहरातील शासकीय आयटीआय समोर आहे.दुसरीकडे मुलांचे वसतिगृह भंडारा रोडवरील खापा टोलीत असून त्यासाठी मासिक ५० हजार रुपये भाडे मोजले जात असल्याची माहिती आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी आदिवासी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही. शासनाने येथे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी केला आहे. मुलींच्या वसतिगृहाजवळ मुलांचे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु निधी दिला जात नाही. त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण घेताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उईके यांनी केला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल गावे आहेत. या गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तुमसर शहरात येतात. परंतु वसतीगृह भाड्याच्या खोलीत असल्याने तेथे पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक भार सहन करून शहरात भाड्याची रूम करून राहतात.वसतीगृहात सुविधांचाही अभाव दिसून येतो. यासाठी तुमसर येथे आदिवासी मुलांचे वसतीगृह उभारण्याची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.ओबीसी मुलींचे वसतिगृह नाहीतुमसर शहरात समाजकल्याण विभागाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह आहे. तेही भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. परंतु मुलींचे वसतिगृह अद्यापही सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींच्या मुलींची शिक्षणासाठी फरफट होत आहे. तुमसर तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर ४५ किमी आहे.त्यामुळे ये जा करणे मुलींना शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुली आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात. तालुक्यातील अनेक गावात हायस्कूलपर्यंतच शाळा आहे. शिक्षणासाठी त्यांनी भंडारा किंवा तुमसरला यावे लागते. अनेक पालक भंडारा शहर दूर पडत असल्याने तुमसरला पसंती देतात. मात्र येथे ओबीसींच्या मुलींसाठी वसतीगृह नसल्याने आर्थिक भार सहन करून रूम भाड्याने घेऊन रहावे लागते. मुलींच्या सुरक्षेची काळजी पालकांना सतावत असते.