व्यसनमुक्ती जनजागृती अभियान
By Admin | Updated: March 30, 2015 00:28 IST2015-03-30T00:28:17+5:302015-03-30T00:28:17+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त ब्ल्यू डायमंड संस्था व बारमाटे मेडिकल सोसायटी ..

व्यसनमुक्ती जनजागृती अभियान
भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त ब्ल्यू डायमंड संस्था व बारमाटे मेडिकल सोसायटी यांच्या विद्यमाने रोहणा येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती एक संकल्प या पुस्तीकेचे व औषधाचे नि:शुल्क वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राधेशाम गाढवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हंसराज आगासे, धनपाल गायधने, दामराज बारमाटे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने व्यसनमुक्ती प्रचार कार्य १९९० पासून सुरु केले पंरतु पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. तेव्हा व्यसनमुक्तीबाबत प्रचार होणे ही आधुनिक काळाची गरज असल्याचे मत प्रमुख पाहुणे व दलित मित्र संस्थेचे सचिव दामराज बारमाटे यांनी व्यक्त केले.
तसेच व्यसनामुळे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती देण्यात आली. दारुमुळे शरीराच्या पेशी कमजोर होऊन दरवर्षी २१ वर्षाखालील ५ हजार तरुण मरण पावतात तर ७५ टक्के लोकांच्या लिव्हरची कार्यक्षमता कमी होवून त्याना काविळ आजार होतो. तर ६० टक्के नागरिकांना नैराश्य येते.
तेव्हा स्वत:चे कुटूंब उद्ध्वस्त होऊ नये, तरुण पिढी व्यसनाधीन हेऊ नये व त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून महिलांनीच स्वत:च्या घरापासून व्यसनमुती संकल्पनेची सुरवात करावी असे आवाहन डॉ. सपना पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. नयना, डॉ. संतोष वाकोडे, डॉ. मुकेश काबळे, डॉ. करिश्मा, डॉ. पंकज पाटील उपस्थित होते. अधिपरिचारिका गीता बारमाटे यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या २०० महिला-पुरुष व युवकाची नोंदणी केली व नि:शुल्क औषधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा गावातील बहुसंख्य महिला व पुरूषांनी लाभ घेतला. कार्यक्रमाकरिता कविता सेवलेकर, ज्योती भांडारकर व मंजुषा मते यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
भाजीपाल्याचे नुकसान
सानगडी : सानगडी गावात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असून कवेलूच्या घरासह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने त्वरीत वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.