शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 07:07 IST

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़ या नियमांचा शोध घेऊन विज्ञानाने निसर्गाच्या लुप्त असलेल्या अनेक रहस्यांची उकल केलेली असून त्याच आधारावर मानवाने सुध्दा अनेक नियम बनविलेले आहेत.

जशी निसर्ग नियमानुसार सृष्टी चालत असते, त्याचप्रमाणे मानवाने तयार केलेल्या नियमानुसार हे जीवन आणि समाज चालत असतो. जेव्हा या नियमांचे उल्लंघन होत असते, तेव्हा रचना विस्कळीत होऊन दुर्घटना घडत असते. जेव्हा समाजामधील आरोग्याचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा शारीरिक आणि मानसिक रोगांची उत्पत्ती होत असते. जेव्हा नैतिकतेचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा समाजामध्ये भेदभाव वाढत असतो़ आर्थिक नियमांचे उल्लंघन होणे ही या गोष्टीची साक्ष आहे की, समाजामध्ये आर्थिक गुन्हे/अपराध वाढलेले आहेत़ तसेच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजेच दुर्घटनेला निमंत्रण देणे होय.़ रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या दुर्घटना, भारतवर्षाकरिता फारच चिंताजनक अशी बाब आहे़ संपूर्ण भारतवर्षामध्ये एका वर्षात १ लक्ष ४० हजार लोक दुुर्घटनांमध्ये मृत्यू पावतात. केवळ महाराष्टÑ राज्यामध्ये रहदारींचे उल्लंघन करून मृत पावणाºयांची संख्या ३३,००० पेक्षा जास्त आहे़ इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटनांमध्ये मृत पावणाºया लोकांची संख्या फक्त भारतामध्येच आहे़ दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण वाहन चालकांची चूक होय़ आपल्या देशामध्ये ७० ते ८० टक्के दुर्घटना या वाहनचालकांच्या चुकांमुळे घडत असतात़ सदर दु:खद दुर्घटना घडण्यामध्ये १६ ते ३५ वर्षे वय असलेल्या व्यक्तींचा सर्वात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जो वर्ग देश, समाज आणि परिवाराचा आधार आहे, तोच या दुर्घटनेचा शिकार होत आहे़ अशा प्रकारच्या दुर्घटनांना थांबविण्याचे काम हे प्रशासनाचे तर आहेच़ परंतु सामान्य जनतेच्या सक्रिय सहयोगाशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नाही़ याचा प्रारंभ आम्ही शिकत असलेल्या शाळेतून/विद्यालयातून व्हावयास पाहिजे़ पालकांची भूमिकासुध्दा यादृष्टीने फार महत्त्वाची आहे़ पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना समजावण्यापासून, स्वत: नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे़ त्यामुळे दुर्घटनांना आळा बसण्यास फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल़ अशा प्रकारे दुर्घटनांमुळे होणाºया मृत्यूंंना थांबवून आम्ही कधीही न भरल्या जाऊ शकणाºया नुकसानीला आळा घालू शकतो़

 - डॉ़ भूषण कुमार उपाध्याय

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीस