शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नजर पैसेवारीत ८४४ गावे ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली. जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : १५ डिसेंबर रोजी घोषित होणाऱ्या अंतिम पैसेवारीकडे भात उत्पादकांचे लक्ष

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा$ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांना बसला असताना प्रशासनाने घोषित केलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील ८४४ गावे ५० पैशापेक्षा अधिक आहेत. सुरूवातीला अपुरा पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी आणि कीडींचे आक्रमण अशा अवस्थेत पैसेवारी अधिक घोषित झाल्याने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. ५० पेक्षा अधिक पैसेवारी असल्यास दुष्काटी मदतीची आशा मावळते.यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली.जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. सप्टेंबर झालेल्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. सध्या उच्च प्रतीच्या धानाला एका पाण्याची गरज आहे. गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व कीडींच्या प्रादूर्भावाने हातचे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.जिल्ह्यात ८९८ महसुली गावे आहेत. आता महसूल विभागाने सादर केलेल्या नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात ८४४ गावांची खरीप पिकांची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी ५० पैशापेक्षा अधीक दाखविली आहे.धान पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता असताना महसूल विभागाने मात्र सरसकट सातही तालुक्यातील पैसेवारीस ५० पुढे असल्याचे म्हटले आहे. महसूल विभागाचा सुधारित पैसेवारीला अहवाल ३० ऑक्टोबर रोजी येणार असून १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत शेतकरी दुष्काळाच्या स्थितीत असतानाही नजर आणेवारी ५० पेक्षा अधिक निघाल्याने शासनाकडून मदतीची आशा मावळत चालली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्यातरी कुणाचे लक्ष नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी