शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका; भंडाऱ्यासह बहुतांश ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:48 IST

Mahavitaran Strike | जिल्ह्यातील ७७५ वीज अधिकारी-कर्मचारी आजपासून संपावर

भंडारा :वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीजकर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले असून बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी-कर्मचारीसंपात सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालविली आहे.

सरकारने वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी बुधवारपासून संपावर जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व ७७५ कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. संपामुळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही.

भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याने केवळ अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंताच कार्यालयात राहणार आहेत.

मोबाइल रिचार्ज करून ठेवा, पाण्याची टाकी भरून घ्या

वीज अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी आपले मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशात म्हटले आहे.

त्रास देण्याच्या उद्देशाने संप नाही

राज्यातील सर्व वीज अधिकारी-कर्मचारी तीन दिवस संपात सहभागी होत आहेत. या संपाचा त्रास ग्राहकांना होणार आहे. परंतु, ग्राहकांना त्रास होण्याच्या उद्देशाने हा संप नाही, तर खासगीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून खासगीकरणाच्या विरोधात संप असल्याचे एका निवेदनात राज्य वीज अधिकारी-कर्मचारी संघर्ष समितीने म्हटले आहे.

...तर अंधाराचे साम्राज्य

वीज वितरण कंपनीने संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. आवश्यकता असेल तेथे मनुष्यबळ वापरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, खासगी एजन्सीच्या व्यक्तींना तत्काळ बिघाड शोधणे आणि तो दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपकाळात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

संपकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. त्यांच्या मनुष्यबळाच्या भरवशावर आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे.

- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजEmployeeकर्मचारीStrikeसंपbhandara-acभंडारा