शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका; भंडाऱ्यासह बहुतांश ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:48 IST

Mahavitaran Strike | जिल्ह्यातील ७७५ वीज अधिकारी-कर्मचारी आजपासून संपावर

भंडारा :वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीजकर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले असून बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी-कर्मचारीसंपात सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालविली आहे.

सरकारने वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी बुधवारपासून संपावर जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व ७७५ कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. संपामुळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही.

भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याने केवळ अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंताच कार्यालयात राहणार आहेत.

मोबाइल रिचार्ज करून ठेवा, पाण्याची टाकी भरून घ्या

वीज अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी आपले मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशात म्हटले आहे.

त्रास देण्याच्या उद्देशाने संप नाही

राज्यातील सर्व वीज अधिकारी-कर्मचारी तीन दिवस संपात सहभागी होत आहेत. या संपाचा त्रास ग्राहकांना होणार आहे. परंतु, ग्राहकांना त्रास होण्याच्या उद्देशाने हा संप नाही, तर खासगीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून खासगीकरणाच्या विरोधात संप असल्याचे एका निवेदनात राज्य वीज अधिकारी-कर्मचारी संघर्ष समितीने म्हटले आहे.

...तर अंधाराचे साम्राज्य

वीज वितरण कंपनीने संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. आवश्यकता असेल तेथे मनुष्यबळ वापरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, खासगी एजन्सीच्या व्यक्तींना तत्काळ बिघाड शोधणे आणि तो दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपकाळात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

संपकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. त्यांच्या मनुष्यबळाच्या भरवशावर आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे.

- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजEmployeeकर्मचारीStrikeसंपbhandara-acभंडारा