शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका; भंडाऱ्यासह बहुतांश ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:48 IST

Mahavitaran Strike | जिल्ह्यातील ७७५ वीज अधिकारी-कर्मचारी आजपासून संपावर

भंडारा :वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीजकर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले असून बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी-कर्मचारीसंपात सहभागी होत आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालविली आहे.

सरकारने वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी बुधवारपासून संपावर जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व ७७५ कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. संपामुळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही.

भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याने केवळ अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंताच कार्यालयात राहणार आहेत.

मोबाइल रिचार्ज करून ठेवा, पाण्याची टाकी भरून घ्या

वीज अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी आपले मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशात म्हटले आहे.

त्रास देण्याच्या उद्देशाने संप नाही

राज्यातील सर्व वीज अधिकारी-कर्मचारी तीन दिवस संपात सहभागी होत आहेत. या संपाचा त्रास ग्राहकांना होणार आहे. परंतु, ग्राहकांना त्रास होण्याच्या उद्देशाने हा संप नाही, तर खासगीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून खासगीकरणाच्या विरोधात संप असल्याचे एका निवेदनात राज्य वीज अधिकारी-कर्मचारी संघर्ष समितीने म्हटले आहे.

...तर अंधाराचे साम्राज्य

वीज वितरण कंपनीने संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. आवश्यकता असेल तेथे मनुष्यबळ वापरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, खासगी एजन्सीच्या व्यक्तींना तत्काळ बिघाड शोधणे आणि तो दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपकाळात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

संपकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खासगी एजन्सीला सतर्क केले आहे. त्यांच्या मनुष्यबळाच्या भरवशावर आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे.

- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजEmployeeकर्मचारीStrikeसंपbhandara-acभंडारा