शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

६३ लाखांचे चुकारे थकीत

By admin | Updated: January 7, 2016 00:58 IST

करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली.

खरेदी बंद : करडी धान खरेदी केंद्रावरील प्रकारयुवराज गोमासे करडी (पालोरा) करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली. २ डिसेंबर २०१५ रोजी सुरु झालेल्या केंद्रावर आतापर्यंत ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. केंद्र सुरु होवून एक महिन्याचा कालावधी लोटत असताना अजूनपर्यंत ६६ लाख, १० हजार ९४८.५० रुपयांचे चुकारे मिळालेले नाहीत. थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकरी केंद्राच्या चकरा काढीत असून गोडावून पूर्ण भरल्याने सध्या खरेदी बंद आहे. करडी येथील ग्रामपंचायतच्या कृषी गोडावून मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सदर केंद्र करडी येथील जयकिसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला धान खरेदीसाठी देण्यात आले. या संस्थेमार्फत परिसरातील धानाची खरेदी शासकीय आधारभूत दरात केली जात आहे. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन दिवाळी अगोदर करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष खरेदी २ डिसेंबरपासून करण्यात आली. २ डिसेंबर ते २ जानेवारी १०१६ पर्यंत केंद्रावर ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी प्रती क्विंटल १४१० या शासकीय दरात करण्यत आली. एकुण ६६ लक्ष १०हजार ९४८ रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अद्याप चुकारे शेतकऱ्ळांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आज उद्या चुकारे दिले जातील, असे सांगितले जात असल्याने शेतकरी बंद केंद्राच्या चकरा मारीत आहेत. परंतु केंद्रावर कोणीही मिळत नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे.करडी केंद्राचे गोडावून भरल्याचे कारण देत केंद्र बंद करण्यात आले. केंद्रावर शेतकरी वर्गाने आणलेल्या धान्य परत न्यावा लागला. त्याचा अतिरिक्त खर्च (वाहतूक, हमाली आदी) शेतकऱ्यांच्या माथी बसला. गोडावून मधील धान्याची उचल झाल्यानंतर केंद्र सुरु होतील, असे सांगितले जात आहेत. मात्र केव्हा मालाची उचल होणार? केव्हा केंद्र सुरु होणार? केव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे चुकारे मिळणार? आदी प्रश्नांची माहिती कोणीही देण्यास तयार नाहीत. चकरा मारून थकलेला शेतकरी केंद्रावर धानाची विक्री करून फसल्याची भावना व्यक्त करीत आहे. राज्य शासनाने केंद्र सुरु करताना वेळेवर व खरेदीच्या ८ दिवसात शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, असे आश्वास दिले होते. ते आश्वासन फोल ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा उद्घाटन प्रसंगी दिलेल्या शब्दांना आता अर्थ उरला नसल्यांचे, दिशाभूल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत. करडी येथील धान खरेदी केंद्र परिपूर्ण भरलेला आहे. त्यामुळे खरेदी बंद आहे. गोडावून रिकामे झाल्यानंतर केंद्र पुन्हा सुरु केले जातील. चुकाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. चुकाऱ्यांचे वाटप प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर केले जाईल. खरेदी बंद करण्यात आली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष शरद तितीरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.