शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शेतकरी अपघात विमा योजनेची ५४ प्रकरणे अडकली त्रुटीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:07 AM

राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास ...

राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळण्याची यात सोय आहे. योजनेत पूर्वी फक्त खातेदार शेतकरी होते; मात्र शासनाने त्याची व्याप्ती वाढवून शेतकरी कुटुंबालाही विमाछत्र दिले आहे. जिल्ह्यात २०१६ ते १७ पासून आतापर्यंत ३४५ प्रस्ताव आलेले आहेत. त्यापैकी अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे.

कोणाला किती मिळते मदत?

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या अपघातात वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळते. अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत देण्यात येते. दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते.

प्रस्ताव प्रलंबित का?

विविध त्रुटींमुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहात आहेत. सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असतात; परंतु कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून येत असल्याने प्रस्ताव प्रलंबित राहतात.

सर्वाधिक प्रकरणे

शेतकरी अपघात विमा योजनेत सर्वाधिक प्रकरणे ही विजेचा धक्का, सर्पदंशाची आहेत. त्यानंतर रस्ता अपघात व वाहन अपघाताची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

२०१६-१७ ते २०१९-२० या वर्षातील आढावा

दाखल प्रस्ताव ३४५

मंजूर १७८

नामंजूर ५४

प्रक्रियेत ८५