शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

५२९ कोंबड्यांच्या उष्णतेमुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:22 IST

सोनपुरी येथील घटना : दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायांतर्गत उभारलेल्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल ५२९ कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यामुळे सोनपुरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारला उघडकीला आली.

दरम्यान, सलग सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करीत नुकसानभरपाई मागितली आहे. पोल्ट्री फार्मसाठी कठाणे यांनी वीजपुरवठ्यासंदर्भात विद्युत रोहित्रासाठी दोन लाख भरले होते. बुधवार, दि.२६ जूनला सकाळी ८ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरण अभियंत्यांना फोन केला. येथे २४ तास वीजपुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत ते मृत्यू पावत आहेत. वीज गेल्यानंतर पोल्ट्री फार्मवरील कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे, ही क्रिया करीत कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले; पण ते प्रयत्न विफल ठरले. यानंतर फोनवरच महावितरण अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वीज सुरू होणार नाही, असे शेतकऱ्यास सांगितले.

६ तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने उष्णतेमुळे बुधवारला ४७२, तर गुरुवारला पहाटे ५७ कोंबड्यांचा मृत्यू झाला. दोन लाख रुपये भरून ट्रान्सफॉर्मर बसविले, जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला २४ तास वीज अबाधित उपलब्ध राहील; पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्यावर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर नुकसानभरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे. यापुर्वीही लाखनी तालुक्यात उष्णतेमुळे कोंबड्या दगावल्या होत्या.

"गत १० वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी मी १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मला नेहमीच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होणे, या समस्येला लागते. महावितरणच्या तोंड द्यावे निष्काळजीपणाने माझे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने हे नुकसान तातडीने भरून द्यावे."- गिरीश कठाणे, पोल्ट्री फार्मचालक, सोनपुरी

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbhandara-acभंडारा