शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने ४५२ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे४६ लाखांचे नुकसान : महसूल विभागाचे सर्व्हेक्षण, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ४५२ घरांची पडझड झाली असून ४६ लाख ७० हजार रूपयांचे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणात ही नुकसानीची आकडेवारी पुढे आली आहे.लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले. तालुक्यात १८ गोट्यांची पडझड होवून ९५ हजार रूपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे ९४ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. कपडे, भांडे व अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झाली नाही. केवळ एक वासरू पाण्यात वाहून गेले.तालुक्यात मुरमाडी-सावरी येथील ४० घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले होते. तर रेंगेपार कोठा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ३३ घरात पाणी शिरले. तसेच लाखनी, सावरी, सोमलवाडा, मेंढा, केसलवाडा वाघ, गराडा, किन्ही, दैतमांगली, चिखलाबोडी, गोंडसावरी, रेंगेपार कोठा, खेडेपार, लाखोरी, आलेसूर, पिंपळगाव सडक, सामेवाडा, रेंगेपार कोहळी, चिचटोला, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, केसलवाडा पवार, परसोडी, मुंडीपार, सिद्धीपार, मारेगाव, राजेगाव, निलागोंदी, इसापूर, मचारणा, मांगली, रेंगोळा, पोहरा, कनेरी, पेंढरी, चालना, धानला, सिपेवाडा, मानेगाव, मेंढा पोहरा, पालांदूर, मºहेगाव, पाथरी आदी गावात घरांची पडझड झाली आहे. या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.२४०० हेक्टर शेती पाण्याखालीलाखनी तालुक्यात २० व २१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने २४०० हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. त्यापैकी ३३ टक्केच्या आतमध्ये १६९६ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. भाजीपाला पिकांचे ७३.५० हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले. तालुक्यातील १९९० भात उत्पादक तर १६८ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.पुराचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान झाल्यास वयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करावी. सदर माहिती संबंधित बँक, विमा कंपनी किंवा कृषी व महसूल विभागात देणे आवश्यक आहे.- पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी.

टॅग्स :Rainपाऊस