सहा विद्यार्थ्यांना ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य
By Admin | Updated: September 11, 2016 00:33 IST2016-09-11T00:33:47+5:302016-09-11T00:33:47+5:30
विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या ६ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे ...

सहा विद्यार्थ्यांना ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य
राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना
भंडारा : विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या ६ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनीराजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेद्वारे मंजूर केले.
यामध्ये जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा विरली ता. लाखांदूर येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी चेतन तरोणे याचा धानाच्या पोत्याखाली दबून मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोवा ता.भंडारा येथील तिसऱ्या वर्गात शिकणारा नकुल फलबांधे याचा विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडी ता. लाखनी येथील चौथ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आकाश पटले याचा बुडून मृत्यू झाला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही (मोखे) ता. साकोली येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी रूद्रप्रताप उंदिरवाडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. एस.एस. इंग्लीश स्कूल अडयाळ ता. पवनी येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी चाणक्ष पोपट याचा वाहन अपघाताने मृत्यू झाला होता तर नवजीवन विद्यालय निष्टी ता. पवनी येथील दहाव्या वर्गातील सारीका अलोणे हिचा जळाल्याने मृत्यू झाला होता.
अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहा दाव्यांकरीता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दावे दाखल केले होते. या प्रस्तावांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रूपये याप्रमाणे ४.५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले. (जिल्हा प्रतिनिधी)