४० वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम

By Admin | Updated: September 6, 2016 00:24 IST2016-09-06T00:24:13+5:302016-09-06T00:24:13+5:30

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो.

For 40 years the tradition of the Akhara has always been there | ४० वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम

४० वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम

चिचाळ येथील उपक्रम : ७० मल्ल्यांचा सहभाग, विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह देऊन गौरव
प्रकाश हातेल चिचाळ
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ७० मल्ल्यांनी सहभाग नोंदविला. अँड देविदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे.
सालाबादाप्रमाणे या वर्षाला पवनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर बाजार चौक चिचाळ येथे आखाड्याचे आयोजन अ‍ॅड. देविदास वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अतिथी म्हणून जयराम दिघोरीे, दिवारु वाघधरे, देवराव वाघधरे, योगीराज मुकूर्णे, रामकृष्ण वैरागडे, विनायक बनकर, पो.पा. तुकेश वैरागडे, बिराशिराम भुरे, वासुदेव लेंडे, श्रीकृष्ण काटेखाये, लहू खोब्रागडे, कोटीराम जिभकाटे, यशवंत लोहकर, बिरशिराम भुरे, विनोद वाघधरे, शंकर मांडवकार, सरपंच मुनिश्वर काटेखाये आदीच्या उपस्थित होते. या आखाड्यात पंचकोशीतील व परजिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला होता. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह भेट वस्तू देवून गौरविण्यात आले. मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करित असतात.
मागील ४० वर्षांपासून ही परंपरा कायम राखल्याने अनेकांना ही सांस्कृतिक पर्वणीच असल्याचे वाटते. प्रथम, द्वितीय मल्ल्यांना रोख रक्कम व स्मृति चिन्ह देण्यात आले. जिल्ह्यातील मल्ल प्रेमीनी मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शविली होती. पंच म्हणून इश्वर वैद्ये, जयराम दिघोरे, देवराम वाघधरे, बिरशिराम भुरे यांनी केले. यादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: For 40 years the tradition of the Akhara has always been there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.