शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३४ प्राथमिक शाळांना ‘शेवटची घटका’

By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST

इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर

प्रशांत देसाई - भंडाराइंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी ३४ प्राथमिक शाळांमधील (इयत्ता पहिली ते चवथी) पटसंख्या दहाच्या आत असल्याने या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासनाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनासह पाठ्यपुस्तके मोफत व शालेय गणवेश वाटप करण्यात येत आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवित आहेत. यामुळे जिल्ह्यातील ३४ प्राथमिक शाळांची पटसंख्या दहा विद्यार्थ्यांच्या आत आहे. परिणामी ‘त्या’ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात जिल्हा परिषदच्या २३ शाळांचा समावेश असून नगरपालिकेच्या चार तर खासगी सात शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सर्वाधिक १३ शाळा भंडारा तालुक्यातील आहेत. त्यानंतर पवनी तालुक्यातील १२ शाळांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील तीन, साकोली दोन, लाखांदूर तीन व लाखनी तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून शर्थीचे प्रयत्न होत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नाही. त्यामुळे या शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास वेतनावर होणारा खर्च वाचेल. जिल्ह्यातील ३४ शाळांमध्ये पटसंख्येचा विचार केल्यास या शाळांची अवस्थ दयनीय असून त्यात जिल्हा परिषद शाळांचाच समावेश आहे.