शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

३४ प्राथमिक शाळांना ‘शेवटची घटका’

By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST

इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर

प्रशांत देसाई - भंडाराइंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी ३४ प्राथमिक शाळांमधील (इयत्ता पहिली ते चवथी) पटसंख्या दहाच्या आत असल्याने या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासनाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनासह पाठ्यपुस्तके मोफत व शालेय गणवेश वाटप करण्यात येत आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवित आहेत. यामुळे जिल्ह्यातील ३४ प्राथमिक शाळांची पटसंख्या दहा विद्यार्थ्यांच्या आत आहे. परिणामी ‘त्या’ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात जिल्हा परिषदच्या २३ शाळांचा समावेश असून नगरपालिकेच्या चार तर खासगी सात शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सर्वाधिक १३ शाळा भंडारा तालुक्यातील आहेत. त्यानंतर पवनी तालुक्यातील १२ शाळांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील तीन, साकोली दोन, लाखांदूर तीन व लाखनी तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून शर्थीचे प्रयत्न होत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नाही. त्यामुळे या शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास वेतनावर होणारा खर्च वाचेल. जिल्ह्यातील ३४ शाळांमध्ये पटसंख्येचा विचार केल्यास या शाळांची अवस्थ दयनीय असून त्यात जिल्हा परिषद शाळांचाच समावेश आहे.