शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने लावली आग, ३३ एकरातील धानाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:31 IST

शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचे नुकसानकिन्ही मोखे येथील घटना

संजय साठवणे

भंडारा : धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी धानाचा चुरणा केला नाही. धानाचे पुंजणे शेतातच होती. अंधाराचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावर पोलिसांना एक चिट्ठी व बॅचेस सापडले असून दोषीविरुद्ध कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. घटना उघडकीला आल्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाल्याची फक्त अधिकृत घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतातच होते. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने ३३ एकर शेतीतील धानाच्या अठरा पुंजण्याला आग लावून जाळून टाकले.

एवढ्या मोठ्या क्षेत्रातील धानाच्या पुंजण्याला एकाचवेळी आग लावण्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. आग लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले होते. मंडळ अधिकारी हलमारे यांनी जळालेल्या धान्याच्या पुंजण्याचे पंचनामे केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करा

अज्ञात इसमाने धान पुंजण्याला आग लावीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घटनास्थळी आढळली चिठ्ठी

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी व समारंभात वापरले जाणारे बॅचेस सापडले आहेत. या चिठ्ठीवर धानाचे पुंजणे जाळले आहे, असे नमून केले आहे. या चिठ्ठीचा या बॅचेसशी काही तारतम्य आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी धानाच्या पुंजण्याला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस ३३ एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती