शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने लावली आग, ३३ एकरातील धानाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:31 IST

शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचे नुकसानकिन्ही मोखे येथील घटना

संजय साठवणे

भंडारा : धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी धानाचा चुरणा केला नाही. धानाचे पुंजणे शेतातच होती. अंधाराचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावर पोलिसांना एक चिट्ठी व बॅचेस सापडले असून दोषीविरुद्ध कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. घटना उघडकीला आल्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाल्याची फक्त अधिकृत घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतातच होते. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने ३३ एकर शेतीतील धानाच्या अठरा पुंजण्याला आग लावून जाळून टाकले.

एवढ्या मोठ्या क्षेत्रातील धानाच्या पुंजण्याला एकाचवेळी आग लावण्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. आग लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले होते. मंडळ अधिकारी हलमारे यांनी जळालेल्या धान्याच्या पुंजण्याचे पंचनामे केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करा

अज्ञात इसमाने धान पुंजण्याला आग लावीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घटनास्थळी आढळली चिठ्ठी

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी व समारंभात वापरले जाणारे बॅचेस सापडले आहेत. या चिठ्ठीवर धानाचे पुंजणे जाळले आहे, असे नमून केले आहे. या चिठ्ठीचा या बॅचेसशी काही तारतम्य आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी धानाच्या पुंजण्याला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस ३३ एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती