शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने लावली आग, ३३ एकरातील धानाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:31 IST

शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचे नुकसानकिन्ही मोखे येथील घटना

संजय साठवणे

भंडारा : धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी धानाचा चुरणा केला नाही. धानाचे पुंजणे शेतातच होती. अंधाराचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने किन्हीझमोखे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे जवळपास आठ लक्ष २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावर पोलिसांना एक चिट्ठी व बॅचेस सापडले असून दोषीविरुद्ध कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. घटना उघडकीला आल्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाल्याची फक्त अधिकृत घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतातच होते. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने ३३ एकर शेतीतील धानाच्या अठरा पुंजण्याला आग लावून जाळून टाकले.

एवढ्या मोठ्या क्षेत्रातील धानाच्या पुंजण्याला एकाचवेळी आग लावण्याची भंडारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. आग लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले होते. मंडळ अधिकारी हलमारे यांनी जळालेल्या धान्याच्या पुंजण्याचे पंचनामे केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करा

अज्ञात इसमाने धान पुंजण्याला आग लावीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घटनास्थळी आढळली चिठ्ठी

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी व समारंभात वापरले जाणारे बॅचेस सापडले आहेत. या चिठ्ठीवर धानाचे पुंजणे जाळले आहे, असे नमून केले आहे. या चिठ्ठीचा या बॅचेसशी काही तारतम्य आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी धानाच्या पुंजण्याला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस ३३ एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती