शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

तलाव रपट्याच्या बांधकामासाठी ३२ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:59 IST

१९९२ पासून रखडलेल्या जांभळापाणी तलावाच्या रपट्याचे काम अखेर मंजूर झाले. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाच्या साठवण क्षेत्रात वाढ होण्यासाठी आवश्यक रपट्याच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचे माध्यमातून ३२ लाखांचा निधी प्राप्त झाला.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : जांभळापाणी येथील १८७ एकर शेतीला होणार सिंचनाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : १९९२ पासून रखडलेल्या जांभळापाणी तलावाच्या रपट्याचे काम अखेर मंजूर झाले. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाच्या साठवण क्षेत्रात वाढ होण्यासाठी आवश्यक रपट्याच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचे माध्यमातून ३२ लाखांचा निधी प्राप्त झाला. यामुळे तलावाच्या सिंचन क्षमतेत वाढ होवून १८७ एकर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. सदर कामाचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य निलीमा इलमे यांचे हस्ते झाले.जांभळापाणी तलावाच्या तुटलेल्या रपट्याच्या बांधकामाची सन १९९२ पासून मागणी होती. परंतू शासन स्तरावरुन निधी मिळत नसल्यामुळे सिंचन क्षमता व साठवण क्षमता बाधीत झाली होती. उन्हाळयाच्या सुरुवातीलाच तलावात पाण्याचा ठणठणाट राहतो. शेती, जनावरांना पिण्याचे पाणी व वापराच्या पाण्यासाठी तलावाकाठच्या जांभळापाणी वासियांनी नेहमी भटकण्याची वेळ येते. तलावाच्या रपट्याच्या बांधकामासाठी तसेच कालवा व गेटच्या दुरुस्तीसाठी यापुर्वी ६२ लाखांचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. परंतू शासनाने प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवीत निधी दिला नाही.त्यामुळे बांधकाम रखडलेले होते. जिल्हा परिषद सदस्या निलिमा इलमे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेशी सतत पाठपुरावा केल्यामुळे दोन वर्षानंतर रपट्याच्या कामासाठी ३२ लाखांचा निधी जलयुक्त शिवार योजनेतून देण्यात आला. यामुळे जांभळापाणी या कोरड्या पडलेल्या तलावाची खरीपातील लाभ क्षमता ५० हेक्टरवरुन ७५ आर होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.भूमीपूजन कार्यक्रमाला जि.प. सदस्या निलिमा इलमे, सरपंच संतोष शेंडे, उपसरपंच कैलाश कंगाले, सदस्य दुर्गाबाई बांडेबूचे, संगिता बुरडे, सपना बुरडे, निलकंठ बांडेबूचे, तुकाराम ढबाले, कविता बांडेबूचे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निशिकांत इलमे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता महेश सेलोकर, कंत्राटदार मोटघरे तुमसर, मनिष लांजेवार, ग्रामसेवक अशोक बागडे, माजी उपसरपंच अशोक शेंडे आदी उपस्थित होते.तलाव उथळ, कालवे व गेट नादुरुस्तमोहाडी तालुक्यातील जांभळापाणी तलावात मोठया प्रमाणात गाळ साचलेला असून उथळ झालेला आहे. त्यामुळे तलावात पाण्याची पूर्ण क्षमतेने साठवणूक करता येत नाही. तलावाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तलावाचे खालीकरण व गाळाचा उपसा होणे गरजेचे आहे. खरिपातील सिंचनासाठी, पाण्याची निकासी होण्यासाठी असलेले एकमेव कालवा व गेट तुटलेली आहे. वर्षभर पाणी 'लिकेज' होत असतो. तलाव व कालवा देखरेखीअभावी ठिकठिकाणी नादुरुस्त आहे. गळतीमुळे उन्हाळयापूर्वीच तलावात पाण्याचा ठणठणाट राहतो. तलावाच्या गेटची दुरुस्ती, कालव्याचे नुतनीकरण व खोलीकरण होण्याची आवश्यकता आहे.जांभळापाणी तलाव २० हेक्टर क्षेत्रात विस्तारीत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून तलावाच्या रेंगाळलेल्या रपट्याचे काम आता पूर्ण होणार असल्याने शेतीच्या लाभ क्षेत्रात वाढ होणार आहे. परंतु सिंचन क्षमता १०० टक्के होण्यासाठी खोलीकरण, एकमेव गेट व कालव्याचे नुतनीकरण व दुरुस्त्या होणे गरजेचे आहे.-संतोष शेंडे, सरपंच, गटग्रामपंचायत मोहगाव/ जांभळापाणी.मागील चार वर्षांपासून सतत करडी परिसरात दुष्काळ होत आहे. जलयुक्त शिवार योजनेतून जांभळापाणी तलावाच्या रपट्याच्या बांधकामामुळे पाण्याच्या साठवणूकीत वाढ होण्यास मदत होईल. परंतु तलावाचा फायदा होण्यासाठी खोलीकरणासोबत नहरांचे खोलीकरण व दुरुस्ती तसेच गेट व कालव्यांच्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे.- नीलिमा इलमे, जि.प. सदस्या, करडी.