शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

४६ गावे सिंचनाखाली ३१ गावे अद्याप वंचित

By admin | Updated: October 4, 2016 00:32 IST

मागील ३५ वर्षानंतर बावनथडी प्रकल्प अंतर्गत आठ गावांना प्रथमच सिंचनाचा लाभ झाला.

मुख्य कालवा फुटला : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणीमोहन भोयर तुमसरमागील ३५ वर्षानंतर बावनथडी प्रकल्प अंतर्गत आठ गावांना प्रथमच सिंचनाचा लाभ झाला. बावनथडी प्रकल्पाचा फूटलेल्या मुख्य उजवा कालव्याची पाहणी करिता सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. सिंचन मंत्र्याच्या दालनात समीक्षा बैठक झाल्यानंतर अधिकऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेटी दिल्या हे विशेष. सिंचन क्षमता तथा इतर बाबींची चौकशी त्यांनी केली. ७७ गावांपपैकी ४६ गावे सिंचनाखाली आली असून ३१ गावे सिंचनापासून वंचित आहेत.२० दिवसापूर्वी खरीप पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. मुख्य कालवा ० ते ८ कि़मी. दरम्यान मुख्य कालव्याला मोठे भगदाड पडले होते. हा प्रकार आलेसुर गावाजवळ घडला होता. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मशीन्सने हा कालवा दुरूस्त केला. ३० सप्टेंबरपर्यंत १७५३७ हेक्टरपैकी ४६ गावातील ९८२६ हे, शेतीला सिंचनाची सोय झाली. एकूण ७७ गावांना सिंचनाचा लाभ येथे मिळणार आहे. ३५ वर्षानंतर कारली, आसलपानी, शिवनी, पिंपळगाव, धर्मापूरी, खैरी को., इंदूरखा, मोहाडी या गावाला सिंचन करण्यात आले. ४६ गावांना सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यात तुमसर तालुक्यातील ३७ तर मोहाडी तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे. मांडवी, चिखली, कुरमुडा, डोंगरी बु., चांदमारा, गर्रा, आंबागड, हरदोली, टाकला, हिंगना, काटेबाम्हणी, हसारा, सालई विहीरगाव, खापा, मांगली, तामसवाडी, तुडका, देव्हाडी, परसवाडा, मांढळ, खरबी, पांजरा, दावेझरी, रामपूर,नेरला, आंधळगाव, सालई खुर्द, उसर्रा, टांगा, पालडोंगरी, भिकारखेडा, डोंगरगाव, कळमना, कुसारी, एकलारी, रोहणा, रोहा, बेटाळा ही गावे सिंचनाखाली आली आहेत.२८ सप्टेंबरपासून आ. चरण वाघमारे यांच्या सुचनेनुसार बावनथडी प्रकल्पातून बघेडा जलाशयात पाणी सोडणे सुरू आहे. कारली जलाशयात पाणी भरणे तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होत आहे. सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे, आ. चरण वाधमारे, अधिक्षक अभियंता जयंत गवई, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम, उपविभागीय अभियंता आय.बी. राठोड, सी.बी. नितनवरे, सहायक अभियंता राजेश हटवार, भांडारकर, कार्यकारी अभियंता एस.एस. चोपडे यांनी पाहणी केली.