शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

उस दर वाढीसाठी ३०० शेतकरी धडकले साखर कारखान्यावर; ...तर कारखान्याला उस न देण्याचा निर्धार

By युवराज गोमास | Updated: October 26, 2023 15:15 IST

दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

भंडारा : जिल्ह्यातील देव्हाडा स्थित एकमेव मानस ॲग्रो साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला २१०० रूपये प्रति मेट्रीक टन भाव जाहिर केल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांत असंतोषाची भावना होती. २५ ऑक्टाेंबर रोजी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र, कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी समाधानकारक न करता काढता पाय घेतल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते. दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील मानस ॲग्रो साखर कारखान्यावर ऊस दर वाढ मागणीसाठी ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. कारखाना गेटवर आंदोलक शेतकरी दिवसभर ठिय्या मांडून होते. कारखाना प्रशासनाने राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अत्यल्प भाव जाहिर केल्याचा निषेध व्यक्त केला. उसाला २१०० नव्हे तर २७०० रूपये भाव जाहिर करण्यात यावा, अशी मागणी केली. देव्हाडा येथील कारखाना शेतकऱ्यावर का अन्याय करीत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला.

कमी भावामुळे उत्पादन खर्च निघणार नाही, यामुळे कुटुंबाचे भरणपोषण व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भुमिका घेत शेतकऱ्यांनी मागण्यांसंबंधीचे निवेदन १४ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकऱ्यांनी दिले होते. पण, यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत मोर्चा काढला, आपली मागणी रेटून धरली. परंतु, तोडगा न निघाल्याने आंदोलन फसल्याची चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी यादोराव मूंगमोडे जांभोरा, मनीष परसूरामकर खोड शिवनी, मुकेश गहाणे हेट्टी, योगराज पारधी मलुटोला, हेमराज हातझाडे सोमलपुर, अनिल लंजे बोलादा, अशोक बोरकर पाथरी, देवेश कशिवार मुरपार, यशवंत कापगते उमझरी यांनी केले.

तोडगा न काढता पळाले उपाध्यक्षआंदोलनादरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. वारंवार टोलवटोलवी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांनी पळ काढल्याचे आंदोलक शेतकरी यादोराव मुंगमोडे यांनी कळविले.

तर...बॉयलर प्रज्वलनावेळी आंदोलन करूकारखाना प्रशासन दरवाढी बाबतील मायेची फुंकर घालून दरवाढीसंबंधात योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आंदोलक शेतकऱ्यांत होती. परंतु, कोणताही निर्णय न घेता उपाध्यक्षांनी काढता पाय घेतल्याने आंदोलक चांगलेच भडकले आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बॉयलर प्रज्वलन वेळी आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने