शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

उस दर वाढीसाठी ३०० शेतकरी धडकले साखर कारखान्यावर; ...तर कारखान्याला उस न देण्याचा निर्धार

By युवराज गोमास | Updated: October 26, 2023 15:15 IST

दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

भंडारा : जिल्ह्यातील देव्हाडा स्थित एकमेव मानस ॲग्रो साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला २१०० रूपये प्रति मेट्रीक टन भाव जाहिर केल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांत असंतोषाची भावना होती. २५ ऑक्टाेंबर रोजी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र, कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी समाधानकारक न करता काढता पाय घेतल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते. दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील मानस ॲग्रो साखर कारखान्यावर ऊस दर वाढ मागणीसाठी ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. कारखाना गेटवर आंदोलक शेतकरी दिवसभर ठिय्या मांडून होते. कारखाना प्रशासनाने राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अत्यल्प भाव जाहिर केल्याचा निषेध व्यक्त केला. उसाला २१०० नव्हे तर २७०० रूपये भाव जाहिर करण्यात यावा, अशी मागणी केली. देव्हाडा येथील कारखाना शेतकऱ्यावर का अन्याय करीत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला.

कमी भावामुळे उत्पादन खर्च निघणार नाही, यामुळे कुटुंबाचे भरणपोषण व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भुमिका घेत शेतकऱ्यांनी मागण्यांसंबंधीचे निवेदन १४ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकऱ्यांनी दिले होते. पण, यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत मोर्चा काढला, आपली मागणी रेटून धरली. परंतु, तोडगा न निघाल्याने आंदोलन फसल्याची चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी यादोराव मूंगमोडे जांभोरा, मनीष परसूरामकर खोड शिवनी, मुकेश गहाणे हेट्टी, योगराज पारधी मलुटोला, हेमराज हातझाडे सोमलपुर, अनिल लंजे बोलादा, अशोक बोरकर पाथरी, देवेश कशिवार मुरपार, यशवंत कापगते उमझरी यांनी केले.

तोडगा न काढता पळाले उपाध्यक्षआंदोलनादरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. वारंवार टोलवटोलवी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांनी पळ काढल्याचे आंदोलक शेतकरी यादोराव मुंगमोडे यांनी कळविले.

तर...बॉयलर प्रज्वलनावेळी आंदोलन करूकारखाना प्रशासन दरवाढी बाबतील मायेची फुंकर घालून दरवाढीसंबंधात योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आंदोलक शेतकऱ्यांत होती. परंतु, कोणताही निर्णय न घेता उपाध्यक्षांनी काढता पाय घेतल्याने आंदोलक चांगलेच भडकले आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बॉयलर प्रज्वलन वेळी आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने