६३ प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:00 AM2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:06+5:30

शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़९५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ पावसाने दडी मारल्याने सिंचनाअभावी शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

30% water storage in 63 projects | ६३ प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा

६३ प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देरोवणी खोळंबली । दमदार पावसाची प्रतीक्षा, सिंचन प्रकल्पातून धानासाठी पाणी

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळा ऋतूला दिड महिना पूर्ण झाला असला तरी जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़९५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ पावसाने दडी मारल्याने सिंचनाअभावी शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २१़४८, बघेडा ५७़७२, बेटेकर बोथली २१.१४ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३४़४८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ३७.९० टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी. लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी, तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविल्याने वैनगंगा नदीपात्रात मुबलक साठा उपलब्ध आहे़

गतवर्षीपेक्षा अधिक साठा
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ३७़६८ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी १८ जुलै रोजी ६३ प्रकल्पात १७़९३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी १४़७३ एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे ऐनपावसाळ्यात शेतकºयांना पावसाची चातकाप्रमाणे वाट पहावी लागत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा प्रकल्पात दुप्पट साठा असल्याने काही प्रकल्पाचे पाणी धानाच्या सिंचनासाठी सोडले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Web Title: 30% water storage in 63 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी