शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

२६ हजार रोपे गायब! वन्यप्राणी की व्यवस्थेचा घोटाळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:37 IST

Bhandara : तक्रारीनंतर नवी चौकशी सुरू होणार काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील डोंगरला येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या तब्बल २६ हजार २८१ रोपांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या रोपांसाठी ७ लाख ३० हजारांचा निधी खर्च करण्यात आल्याचे डोंगरला येथील रोपवाटिकेतील फलकावर नमूद केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी रोपांचे नुकसान कसे करू शकतात, याबाबत हे प्रकरण वनमंत्र्यांच्या दालनात गेले आहे.

तक्रारीनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत रोपे लावल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्ष चौकशी अहवालात मग्रारोहयो किंवा अभिसरण योजनेची नोंद असल्याचे समोर आले आहे. या नोंदीतील विसंगतीमुळेच प्रकरण अधिक संशयास्पद ठरले आहे.

वन्यप्राण्यांचा बहाणा ?सुत्रांच्या मते, ५० हजार रोपांपैकी वन्यप्राण्यांनी २६ हजार २८१ रोपे नष्ट केली, हा दावा संशयास्पद आहे. देखभालअभावी रोपे नष्ट झाली.

२६ हजार पिशव्या कुठे गेल्याडोंगरला रोपवाटिकेत एकूण ५० हजार रोपे तयार करण्यात आली होती. त्यापैकी २६ हजार रोपे वन्य प्राण्यांनी नष्ट केली, असे अहवालात नमूद आहे. रोपे वन्यप्राण्यांनी नष्ट केली. परंतु, ज्या प्लास्टिक पिशवीत ही रोपे लावण्यात आली होती. त्या पिशव्या कुठे गेल्या, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.

अधिकाऱ्यांनी बयान नोंदवलीयाप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक तसेच अधिसंख्य वन मजुराचे बयान घेण्यात आली आहेत. सहायक वनसंरक्षक प्रवीण नाईक, विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे आणि तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांच्या चौकशीची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

"असुरक्षित असलेल्या रोपवाटिकेत एवढा मोठा निधी कसा खर्च करण्यात आला, असे प्रश्न येथे उपस्थित होतात. डोंगरला रोपवाटिकेतील वन्यप्राण्यांनी रोपे नष्ट केली. याप्रकरणी त्रयस्थ समितीने चौकशी करावी, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जाईल."- लक्ष्मण आवारे, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा