शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

झेडपीच्या २५३ रस्त्यांचे बेहाल; दुरुस्तीसाठी ४३ कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:15 IST

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका : ११ वर्षांपासून निधीच मिळाला नाही

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे ११ वर्षांपासून बेहाल आहेत. यंदा अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने सुमारे २५३ रस्ते नुकसानग्रस्त ठरले. जि.प. बांधकाम विभागाच्या वतीने (लेखाशीर्ष ३०५४-२९११ अंतर्गत) ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित सभेत ४३ कोटी १४ लाखांचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यापूर्वीही असाच प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नसल्याने रस्त्यांचे बेहाल कायम आहेत.

रस्ते विकासाचे रोडमॅप मानले जातात. रस्त्यांच्या विकासावरून त्या भागाच्या विकासाचा अंदाज येतो. जिल्ह्यात रस्त्यांच्या विकासासाठी राज्य, केंद्र व जिल्हा परिषदेच्या यंत्रणा कार्यरत आहेत. त्यातच ५२ सदस्य संख्या असलेली जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासाची महत्वपूर्ण यंत्रणा मानली जाते. परंतु, २०१४ पासून ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणांसाठी निधीचा ठणठणाट आहे. ग्रामीण रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न जिल्ह्यातील आमदार आगामी हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार का, हे पाहणे औत्सुक्याचा ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेने पाठविला सुधारित प्रस्तावयंदा भंडारा जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील अतिवृष्टी व पूरपरि स्थितीने हाहाकार उडाला. जिल्हा परिषदेच्या अधिकारातील २५३ रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. पूल उखडले, तर रस्त्यावर चिखल अन् खोल खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. जि.प. बांधकाम विभागाने यापूर्वी ४४,०८४ किमी लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३७ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला. आता ६ डिसेंबर रोजी सुधारित २५३ रस्त्यांचा ४३.१४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आला.

अध्यक्ष म्हणतात, अडीच वर्षात निधीच नाही जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे म्हणतात, माझ्या अडीच यांच्या कालावधीत तसेच २०१४ पासून एकदाही शासनाचा निधी मिळाला नाही. जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी व दोनदा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. हीच स्थिती यावर्षीही आहे. पुरामुळे लहान पुलांना भगदाड पडले, गावागावांना जोडणारे रस्ते पुरात वाहून गेले. किरकोळ सुधारणांशिवाय फारशी कामे झाली नाहीत. परिणामी रस्ते चिखलात दाबले गेले असून, खोल खड्यांमुळे रस्ते जीवघेणे ठरत आहेत.

"जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने रस्त्यांच्या विकासासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनास पाठविला आहे. राज्य शासनाने रस्त्यांसाठी निधी दिल्यास विकासाला वेग वाढणार आहे." - विनोदकुमार चुरे, कार्यकारी अभियंता, जि.प., भंडारा.

"ग्रामीण विकासाच्या पायाभूत यंत्रणेला २०२४ पासून रस्त्यांसाठी निधीच प्राप्त झालेला नाही. परिणामी जिल्हा परिषद सदस्य, तसेच जि.प. अध्यक्ष व बांधकाम सभापतींना नागरिकांचा रोष सहन करावा लागत आहे. शासनाने निधी उपलब्ध करीत दिलासा देण्याची गरज आहे." - संदीप ताले, बांधकाम सभापती, जि. प., भंडारा

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाbhandara-acभंडारा