शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

जिल्हा परिषदेत 235 तर पंचायत समितीत 407 उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात तालुक्यातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात असून त्यात जिल्हा परिषदेच्या ३९ गटात २३५ तर पंचायत समितीच्या ७९ गणात ४०७ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराला प्रारंभ झाला असला तरी बुधवारी ओबीसी आरक्षणावरुन न्यायालयात काय निर्णय लागताे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात तालुक्यातून २३५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील ३९, माेहाडी २३, साकाेली २६, लाखनी १०, भंडारा ७४, पवनी २३ आणि लाखांदूर तालुक्यातील ४० उमेदवारांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या निवडणूकीत तुमसर तालुक्यात ६९, माेहाडी ५०, साकाेली ४२, लाखनी ४४, भंडारा १०३, पवनी ५५ आणि लाखांदूर तालुक्यातील गणांमध्ये ४४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या २३५ उमेदवारांमध्ये १३६ पुरुष तर १९९ महिला उमेदवार आहेत.२१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार असून सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहे. मात्र अद्यापही निवडणूकीवर अनिश्चिततेचे सावट आहे. निवडणूक हाेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. 

ओबीसी आरक्षण प्रकरणात निकालाची उत्सुकता- ओबीसी प्रवर्गातील गट आणि गणातील निवडणूक स्थगित केल्यानंतर या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणात १३ डिसेंबरला निकाल अपेक्षीत हाेता. पंरतु सुनावणी एक दिवसाने पुढे ढकलली. मंगळवारी सुध्दा सुनावणी पूर्ण हाेवू शकली नाही. त्यामुळे आता बुधवारी यावर निकाल अपेक्षीत आहे. न्यायालयाचा निकाल काय लागताे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

प्रचाराचा नारळ फुटला- जिल्ह्यातील ३९ गट आणि ७९ गणातील निवडणूकीसाठी उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फाेडला आहे. आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विकासाचा नारा देत उमेदवारांनी रणधुमाळी सुरु केली आहे. लवकरच या निवडणूकीचे वातावरण तापणार आहे. मात्र सर्वांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

ओबीसींच्या भुमिकेकडे लक्ष- आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भुमिका जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी घेतली आहे. आम्हाला मत मागायला येवू नका असे फलकही अनेकांनी घरावर लावले आहे. निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून उमेदवार सावध भुमिका घेत प्रचार करीत आहे. आता न्यायालयाचा निकाल काय येताे आणि ओबीसी संघटना काय भुमिका घेतात याकडे लक्ष आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक