लाखांदुरात २२५ क्विंटल धान्य घोटाळा
By Admin | Updated: December 9, 2015 00:40 IST2015-12-09T00:40:38+5:302015-12-09T00:40:38+5:30
तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता.

लाखांदुरात २२५ क्विंटल धान्य घोटाळा
कारवाईची मागणी : बेमुदत उपोषण
लाखांदूर : तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी ७ डिसेंबरपासून दुर्गाभैय्या राठोड यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
तहसील कार्यालयाअंतर्गत सन २०१२-१३ जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत अळीच लक्ष रूपये किमतीचे दोनशे क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचे उघड झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दोषींना पाठिशी घातले. यामुळे दुर्गाभैया राठोड यांनी तहसीलदार, धान्य खरेदी निरीक्षक यांना निलंबीत करण्याची मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकीशी केली असता त्यात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसा अभिप्राय असताना कार्यवाही थंडबस्तात ठेवण्यात आल्याचा आरोप करून राठोड यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
मात्र यासंबंधाने येथील स्वस्त धान्य दुकानदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मंदा ढोरे, केशव चुटे, संघमित्रा लांडगे, गुलाब गभणे, विलास हुमणे यांनी आपली बाजू मांडून धान्य निरीक्षकावर आरोप केले. यात गोदामपाल गडपायले यांनी धान्याची अफरातफर केली असून त्याचा आळ दुकानदारांवर लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
गोदामातील रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये दुकानदारांनी धान्य उचलल्याबद्दल सह्या रजिस्टरला दिसून आल्या नाही व काही ठिकाणी राजकुमार गडपायले यांनी खोट्या सह्या करून सदर धानाची परस्पर अपरातफर केल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे.
तहसीलदार यांचेकडून धान्य मंजूर करण्यात आले नसताना खोटे चालान तयार करून ते चालकाचे पैसे गोदामपलकाने दुकानदारांच्या नावात स्वत:च बँकेत भरल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदामपाल गडपायले याने अधिकारी व दुकानदारांची फसवणूक केल्याचे लेखी स्वस्त धान्य दुकानदारांनी म्हटले आहे. मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)