शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा १५७ गावांना फटका; ४३७३ शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:34 IST

सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल : १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५७ गावांतील १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान उन्हाळी धानाचे असून त्या पाठोपाठ आंबा आणि भाजीपाला पिकांचे आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणाचा प्राथमिक अंदाज आला असून त्यात ही नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांमध्ये हे नुकसान अधिक आहे. प्रशासनाच्या १ मे ते ९ मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, मोहाडी तालुक्यातील १०७ गावे आणि तुमसर तालुक्यातील ५० गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये ४.३७३ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात मोहाडी तालुक्यातील ३,४१८ आणि तुमसर तालुक्यातील ९५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

धानावरोबरच आंबा व इतर फळपिके व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील सर्व ७ तालुक्यांमध्ये सुमारे ७०,२२७ हेन्टर क्षेत्रावर शेतकयांनी उन्हाळी पिकांची लागवड केली, त्यापैकी १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत.

पावसाने जनजीवन विस्कळीतमासळ : मासळ व परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक तास झालेल्या वादळी वाऱ्यासह धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी आली आहे. सध्या मासळ परिसरात मोठ्या प्रमाणात धान पीक कापणीला आले आहे. बप्याच शेतकयांनी धान पीक कापून शेतातच ठेवला होता. परंतु झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमे धान, वादळी पावसाने खाली पडले असून उत्पादनात असलेले निश्चितपणे घट होणार आहे. ऐन हातात आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी वर्गात चितेचे सावट पसरले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशमोहाडी : तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. मोहाडी तालुक्यातील १०८ गावांतील पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी आदेश काढले आहेत. पंचनामे करताना मोहाडी तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या विमा प्रतिनिधी यांना सोबत घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली जावी. तातडीने कार्यवाही करुन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास काही तक्रार प्राप्त झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहापूर परिसरात अवकाळी पाऊसशहापूर : परिसरात सकाळपासून ढगाळ होते. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. अध्र्ध्या तासाच्या अंतराने जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष करून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका अधिक प्रमाणात बसला. अनेक ठिकाणी मंडप डेकोरेशन व्यावसायिकांना याचा तडाखा बसला, कार्यक्रमाच्या ठिकाणी उभे असलेले मंडप कोसळून पडले. अचानक झालेल्या पावसामुळे महामार्गावरील वाहतू‌कसुद्धा प्रभावित झाली दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरल्याचे चित्र आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी