शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भंडाऱ्यात दुकानदारांनी करवाढीवर दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:55 IST

अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.

ठळक मुद्देवातावरण तापले काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदारांचा हल्लाबोल

ऑनलाईन लोकमत 

भंडारा : अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी हा अल्टीमेटम देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून पालिका कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी वाढू लागली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात माजी आ. नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड. शिशिर वंजारी, अजय गडकरी, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, डॉ. नितीन तुरस्कर, शम्मु शेख, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण निर्मूलन काढण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबतीत कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना येथे पाचारण करून टॅक्स कसा काय वाढला याचा सर्वांसमक्ष जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान वातावरण तापल्याने मुख्याधिकाºयांच्या कक्षात आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. चर्चेअंती वाढीव गृहकर टॅक्स व अतिक्रमण निर्मूलनाबाबत येत्या १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले. परिणामी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पालिकेच्या द्वारावर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना चर्चेदरम्यान झालेल्या आश्वासनाची माहिती दिली. तसेच १५ दिवसात आश्वासनांची पुर्तता न झाल्यास गंभीर परिणामांना पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.अध्यक्ष-मुख्याधिकारी एकमेकांचेच ऐकतातशहराच्या कुठल्याही समस्येवर नागरिकांची किंवा नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा अध्यक्ष व मुख्याधिकारीच एकमेकांशी चर्चा करून एकमेकांचेच ऐकतात, असा मिष्कील युक्तीवाद अ‍ॅड. शिषिर वंजारी यांनी करताच चर्चेदरम्यान हशा पिकला. यानंतर, जनाची ऐकावी असा सुरही व्यक्त झाला.संतप्त होवू नका, चहा प्यामुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अतिक्रमणाच्या मुद्यावरून फुटपाथ संघटनेचे पदाधिकारी चांगलेच तापले. दुसरीकडे दूषित पाण्याच्या मुद्यावर उपस्थित महिलांनी अध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी दूषित पाणी एकदा तरी प्यावे मगच जनतेच्या आरोग्याचे महत्व लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया चर्चेत व्यक्त केली. यावेळी वातावरण धीरगंभीर झाल्याने माजी आ. भोंडेकर यांनी संतप्त होण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांकडून चहा प्या, असे बोलून वातावरण शांत केले.राकाँ-भाजपची भूमिका गुलदस्त्यातगुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही. सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचे नगरसेवक आंदोलनात नसणे ही बाब मनाला पटणारी असली तरी वाढीव गृहकराच्या बाबतीत पालिकेच्या सभेत भाजप नगरसेवकांनी चांगलाच हल्लाबोल केला होता, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Governmentसरकार