शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भंडाऱ्यात दुकानदारांनी करवाढीवर दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:55 IST

अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.

ठळक मुद्देवातावरण तापले काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदारांचा हल्लाबोल

ऑनलाईन लोकमत 

भंडारा : अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी हा अल्टीमेटम देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून पालिका कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी वाढू लागली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात माजी आ. नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड. शिशिर वंजारी, अजय गडकरी, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, डॉ. नितीन तुरस्कर, शम्मु शेख, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण निर्मूलन काढण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबतीत कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना येथे पाचारण करून टॅक्स कसा काय वाढला याचा सर्वांसमक्ष जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान वातावरण तापल्याने मुख्याधिकाºयांच्या कक्षात आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. चर्चेअंती वाढीव गृहकर टॅक्स व अतिक्रमण निर्मूलनाबाबत येत्या १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले. परिणामी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पालिकेच्या द्वारावर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना चर्चेदरम्यान झालेल्या आश्वासनाची माहिती दिली. तसेच १५ दिवसात आश्वासनांची पुर्तता न झाल्यास गंभीर परिणामांना पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.अध्यक्ष-मुख्याधिकारी एकमेकांचेच ऐकतातशहराच्या कुठल्याही समस्येवर नागरिकांची किंवा नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा अध्यक्ष व मुख्याधिकारीच एकमेकांशी चर्चा करून एकमेकांचेच ऐकतात, असा मिष्कील युक्तीवाद अ‍ॅड. शिषिर वंजारी यांनी करताच चर्चेदरम्यान हशा पिकला. यानंतर, जनाची ऐकावी असा सुरही व्यक्त झाला.संतप्त होवू नका, चहा प्यामुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अतिक्रमणाच्या मुद्यावरून फुटपाथ संघटनेचे पदाधिकारी चांगलेच तापले. दुसरीकडे दूषित पाण्याच्या मुद्यावर उपस्थित महिलांनी अध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी दूषित पाणी एकदा तरी प्यावे मगच जनतेच्या आरोग्याचे महत्व लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया चर्चेत व्यक्त केली. यावेळी वातावरण धीरगंभीर झाल्याने माजी आ. भोंडेकर यांनी संतप्त होण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांकडून चहा प्या, असे बोलून वातावरण शांत केले.राकाँ-भाजपची भूमिका गुलदस्त्यातगुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही. सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचे नगरसेवक आंदोलनात नसणे ही बाब मनाला पटणारी असली तरी वाढीव गृहकराच्या बाबतीत पालिकेच्या सभेत भाजप नगरसेवकांनी चांगलाच हल्लाबोल केला होता, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Governmentसरकार