शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

भंडाऱ्यात दुकानदारांनी करवाढीवर दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:55 IST

अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.

ठळक मुद्देवातावरण तापले काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदारांचा हल्लाबोल

ऑनलाईन लोकमत 

भंडारा : अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी हा अल्टीमेटम देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून पालिका कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी वाढू लागली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात माजी आ. नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड. शिशिर वंजारी, अजय गडकरी, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, डॉ. नितीन तुरस्कर, शम्मु शेख, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण निर्मूलन काढण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबतीत कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना येथे पाचारण करून टॅक्स कसा काय वाढला याचा सर्वांसमक्ष जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान वातावरण तापल्याने मुख्याधिकाºयांच्या कक्षात आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. चर्चेअंती वाढीव गृहकर टॅक्स व अतिक्रमण निर्मूलनाबाबत येत्या १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले. परिणामी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पालिकेच्या द्वारावर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना चर्चेदरम्यान झालेल्या आश्वासनाची माहिती दिली. तसेच १५ दिवसात आश्वासनांची पुर्तता न झाल्यास गंभीर परिणामांना पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.अध्यक्ष-मुख्याधिकारी एकमेकांचेच ऐकतातशहराच्या कुठल्याही समस्येवर नागरिकांची किंवा नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा अध्यक्ष व मुख्याधिकारीच एकमेकांशी चर्चा करून एकमेकांचेच ऐकतात, असा मिष्कील युक्तीवाद अ‍ॅड. शिषिर वंजारी यांनी करताच चर्चेदरम्यान हशा पिकला. यानंतर, जनाची ऐकावी असा सुरही व्यक्त झाला.संतप्त होवू नका, चहा प्यामुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अतिक्रमणाच्या मुद्यावरून फुटपाथ संघटनेचे पदाधिकारी चांगलेच तापले. दुसरीकडे दूषित पाण्याच्या मुद्यावर उपस्थित महिलांनी अध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी दूषित पाणी एकदा तरी प्यावे मगच जनतेच्या आरोग्याचे महत्व लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया चर्चेत व्यक्त केली. यावेळी वातावरण धीरगंभीर झाल्याने माजी आ. भोंडेकर यांनी संतप्त होण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांकडून चहा प्या, असे बोलून वातावरण शांत केले.राकाँ-भाजपची भूमिका गुलदस्त्यातगुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही. सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचे नगरसेवक आंदोलनात नसणे ही बाब मनाला पटणारी असली तरी वाढीव गृहकराच्या बाबतीत पालिकेच्या सभेत भाजप नगरसेवकांनी चांगलाच हल्लाबोल केला होता, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Governmentसरकार