शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१.२८ लाख लोकांची अग्निसुरक्षा रामभरोसे

By admin | Published: December 22, 2014 10:42 PM

प्रशासकीय कामाकाजातील सर्वाेच्च स्थान असलेल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहनाची सोय करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

साकोली : प्रशासकीय कामाकाजातील सर्वाेच्च स्थान असलेल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहनाची सोय करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी असून तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहन मिळालेले नाही. त्यामुळे साकोली तालुक्याला कुठेही आग लागल्यास भंडारा किंवा तुमसर येथून व्यवस्था करावी लागते.साकोली येथे सर्वच विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. त्यामुळे अतिमहत्वाची दस्ताऐवज या कार्यालयात असतात. त्या दस्ताऐवजाची सुरक्षा करणे काळाची गरज ठरली आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात रात्रपाळीला चौकीदाराची सोय केली आहे. शासनाच्या माध्यमातून ही कागदपत्रे जोपासण्यासाठी सर्वाेतोपरी हालचाली होत असले तरी एखाद्यावेळी शासकीय कार्यालयाला आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची येथे सोयच नाही. मागील उन्हाळ्यात साकोली येथील एलआयसी कार्यालयाला आग लागल्याने त्यातील महत्वाची दस्ताऐवज जळून खाक झाले होते. कारण तुमसर येथून अग्नीशामक दलाला येईपर्यंत बराच उशीर झाला होता.साकोली तालुक्यातून चुलबंद नदीसह बरेच लहान मोठे तलाव, नाले आहेत. पुरपरिस्थितीच्या वेळी अग्निशामन विभागाची महत्वाची भूमिका असते. परंतु ज्या विभागावर ही संपूर्ण सुरक्षा अवलंबून आहे. त्या विभागाकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वास्तवच आहे. त्यामुळे गावाचा विस्तारही वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)