शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

कोरोनाने जिल्ह्यात 1133 मृत्यू; प्रत्येक वारसाला मिळणार 50 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 5:00 AM

कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसानास किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते,  त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११३३ जणांचा मृत्यू झाला असून या मृतकांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या मदतीपासून कुणीही वारस सुटू नये याची काळजीही जिल्हा प्रशासन घेणार आहे. कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसानास किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते,  त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे. अशा व्यक्तींचा मृत्यू चाचण्यांमधून झाल्याचेही निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद असते. एखाद्या रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी या योजनेंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला लाभ देण्यात येणार आहे. कोविड १९ च्या प्रकरणात मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड १९ मुळे झाला आहे असे समजण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून त्या माध्यमातून प्रस्ताव देता येणार आहे.

ही हवी कागदपत्रे - अर्ज दाखल करताना वारसान किंवा नातेवाइकाने अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, बँक तपशील व मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र व इतर निकट नातेवाइकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रकरण संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप स्वीकृत होणार आहे. - सर्व अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यातर्फे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. सर्व मंजूर प्रकरणाची माहितीही उपलब्ध राहणार आहे.

कोविड १९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईक किंवा वारसानास सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने जिल्हा पातळीवर डेटा उपलब्ध करण्यासंदर्भात कारवाई सुरु झाली आहे. आरोग्य विभाग यासाठी विशेष सहकार्य करीत आहे. तांत्रिक कारणामुळे जिल्हा आरोग्य विभागामार्फत ज्यांचे प्रकरण सबमीट होणार नाहीत त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

आठवडाभरानंतर होणार वेबपोर्टल तयार

-  कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसानाला लाभ मिळण्यासाठी शासनाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठी वेब पोर्टल तयार करण्याची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. यानंतरच अर्जदार या पोर्टलवर माहितीसह प्रस्ताव सादर करू शकणार  आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना