शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लागवडीखालील १० टक्के क्षेत्र पडित

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत.

धानाचे क्षेत्र सहा टक्के : पावसाचा फटका, बळीराजा पुन्हा संकटातभंडारा : जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत. यात धानपिकाखालील क्षेत्राची टक्केवारी सहा इतकी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास उत्पादनात घट होणार काय, अशी चिंताही सतावू लागली आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सुलतानी संकटात सापडणार आहे. जिल्ह्यात यावर्षी चालू खरीप हंगामात एकूण दोन लक्ष नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रात लागवडीखालील क्षेत्राअंतर्गत विविध धान्य पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट होते. यापैकी एक लक्ष ८७ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करण्यात आली. एकूण लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी ८९.५६ इतकी आहे. त्यामुळे ढोबळ मानाने लागवडीखालील क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहे. यावर्षी भातपिकाच्या सर्वसाधारण एक लक्ष ८२ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लक्ष ७२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. याची टक्केवारी ९४.३९ टक्के इतकी आहे. तसेच एकूण कडधान्याचे पेरणीक्षेत्र ११ हजार ३७८ इतकी आहे. याची टक्केवारी ९३.१७ इतकी आहे. एकूण तेलबिया पिकाचे पेरणी क्षेत्र १२०९ हेक्टर एवढे असून त्याची टक्केवारी १५.५३ आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येत असली तरी बेभरोशाच्या पावसावर बळीराजाची साद असते. पावसाच्या लहरीपणामुळे हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस बरसला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरूवात होताच सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीसह रोवणी कामालाही सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने काही तालुक्यांमध्ये रोवणीची कामे खोळंबली होती. १५ दिवसांपूर्वी वरूणराजाने हजेरी लावताच खोळंबलेली रोवणी करण्यात आली असली तरी जिथे पाऊस बरसला नाही तिथे मात्र अजुनही रोवणी खोळंबलेली असून पऱ्हे पिवळे पडले आहेत. अस्मानी संकटाचा फटका बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी हलक्या धानाला याचा फायदा होणार आहे. मात्र भारी धानाला पुन्हा पावसाची प्रतिक्षा राहणार आहे. (प्रतिनिधी)