शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लागवडीखालील १० टक्के क्षेत्र पडित

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत.

धानाचे क्षेत्र सहा टक्के : पावसाचा फटका, बळीराजा पुन्हा संकटातभंडारा : जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत. यात धानपिकाखालील क्षेत्राची टक्केवारी सहा इतकी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास उत्पादनात घट होणार काय, अशी चिंताही सतावू लागली आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सुलतानी संकटात सापडणार आहे. जिल्ह्यात यावर्षी चालू खरीप हंगामात एकूण दोन लक्ष नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रात लागवडीखालील क्षेत्राअंतर्गत विविध धान्य पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट होते. यापैकी एक लक्ष ८७ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करण्यात आली. एकूण लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी ८९.५६ इतकी आहे. त्यामुळे ढोबळ मानाने लागवडीखालील क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहे. यावर्षी भातपिकाच्या सर्वसाधारण एक लक्ष ८२ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लक्ष ७२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. याची टक्केवारी ९४.३९ टक्के इतकी आहे. तसेच एकूण कडधान्याचे पेरणीक्षेत्र ११ हजार ३७८ इतकी आहे. याची टक्केवारी ९३.१७ इतकी आहे. एकूण तेलबिया पिकाचे पेरणी क्षेत्र १२०९ हेक्टर एवढे असून त्याची टक्केवारी १५.५३ आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येत असली तरी बेभरोशाच्या पावसावर बळीराजाची साद असते. पावसाच्या लहरीपणामुळे हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस बरसला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरूवात होताच सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीसह रोवणी कामालाही सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने काही तालुक्यांमध्ये रोवणीची कामे खोळंबली होती. १५ दिवसांपूर्वी वरूणराजाने हजेरी लावताच खोळंबलेली रोवणी करण्यात आली असली तरी जिथे पाऊस बरसला नाही तिथे मात्र अजुनही रोवणी खोळंबलेली असून पऱ्हे पिवळे पडले आहेत. अस्मानी संकटाचा फटका बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी हलक्या धानाला याचा फायदा होणार आहे. मात्र भारी धानाला पुन्हा पावसाची प्रतिक्षा राहणार आहे. (प्रतिनिधी)