शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

तुमची जन्मतारिख सांगते तुमचा स्वभाव, आरोग्य आणि भविष्य- गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:21 IST

तुमची जन्मतारीख काय ते पहा आणि आपला स्वभाव ताडून पहा.

जन्मतारखेवरून मूलांक कळतो आणि मूलांकाच्या आधारे भविष्य. अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मूलांकांमध्ये जे वैविध्यपूर्ण लोक अखिल विश्वासत सामावले आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ. मार्गदर्शन करत आहेत, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

१,१०,१९,२८ या तारखेला जन्म घेणारे लोक, त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. यांना वातप्रकृतीचा त्रास होतो. पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. त्यांनी माणिक वापरायला हरकत नाही. 

२, ११, २० हे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना दु:खं पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही.

३, १२, २१, ३० या तारखांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लाभल्यावर सर्व क्षेत्रात त्यांची आघाडी दिसून येते. 

४, १३, २२, ३१ या तारखांचे लोक टोकाचे आस्तिक नाहीतर टोकाचे नास्तिक असतात. पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार त्यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे. 

५,१४,२३ जन्मतारिख असणारे लोक अतिशय हुशार असतात. परंतु, हे लोक पटकन नाराज होतात. त्यांना अपमान सहन करता येत नाही. सतत सर्दीने बेजार असतात. त्यांचा स्वामी आहे बुध आणि बुधाचे रत्न आहे पाचू. अशा लोकांनी पाचू धारण करण्याआधी तो नीट पारखून घ्यावा. या जन्मतारखेच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडावी. तसेच त्यांना कायदेविषयातही गती प्राप्त होईल. 

६,१५,२४ जन्मतारिख असणारे लोक राजेशाही असतात. उच्च राहणीमान त्यांना आवडते, मात्र कामाच्या बाबतीत अतिशय आळशी असतात. छोटेसे काम करायलाही पुष्कळ विलंब लावतात. एखाद दिवशी काम करतील, तर दुसऱ्या दिवशी अजिबात काम नाही, एवढा सुस्तपणा त्यांच्यात असतो. या स्वभावात भर म्हणजे, चटपटीत आणि गोड पदार्थांचे सेवन त्यांना आणखी आळशी बनवते. परंतु या तारखेचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सौंदर्याचा उपासक आहे. त्यामुळे आळशी असूनही या लोकांमध्ये नीटनेटकेपणा आणि शानशौकीची आवड दिसून येते. शुक्राचे रत्न हिरा आहे. तो परिधान केला असता, या लोकांचे भाग्य हिऱ्यासारखे उजळते. 

७,१६,२५ या जन्मतारखेच्या व्यक्ती पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेल्या आहेत. चविष्ट पदार्थ आवडतात. वयाच्या ३५ नंतर पोटाचे त्रास. त्यांना अनेक स्वप्न पडतात, त्यापैकी अनेक स्वप्न खरी होतात. लागणे, भाजणे, चिरणे या गोष्टी वारंवार घडतात.

८,१७,२६ जन्मतारिख असणाऱ्या लोकांचा स्वामी शनि आहे आणि शनिचे रत्न निलम आहे. या लोकांच्या वाट्याला बालपणापासून दुखापती फार. गुडघेदुखी, पायदुखी, डोकेदुखीचे सतत त्रास होतात. हे हाडाचे इंजिनिअर असतात. तंत्र, यंत्र, उपकरण, स्थापत्य, अभियंता होतात.

९,१८,२७ जन्मतारिख असणारे लोक मंगळाच्या प्रभावाखाली असतात. मंगळाचे रत्न पोवळे आहे. त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. त्यांनी पोवळ्याचा वापर केला पाहिजे. कोणत्याही मंगळवारी पोवळे धारण करावे. पोवळे देवीचे रत्न आहे. सर्व भगिनींनी त्याचा वापर करावा, अवश्य लाभ होता़े युद्ध, पराक्रम, भांडण यांचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे हे लोक नेहमी नेतृत्वात पुढे असतात. त्यांच्या ठायी पराक्रम असतो, परंतु त्यांनी भावनांवर, रागावर आवर घालण्यासाठी पोवळ्याचा वापर करावा. 

टॅग्स :Annasaheb Moreअण्णासाहेब मोरे