शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

तुमची जन्मतारिख सांगते तुमचा स्वभाव, आरोग्य आणि भविष्य- गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:21 IST

तुमची जन्मतारीख काय ते पहा आणि आपला स्वभाव ताडून पहा.

जन्मतारखेवरून मूलांक कळतो आणि मूलांकाच्या आधारे भविष्य. अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मूलांकांमध्ये जे वैविध्यपूर्ण लोक अखिल विश्वासत सामावले आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ. मार्गदर्शन करत आहेत, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

१,१०,१९,२८ या तारखेला जन्म घेणारे लोक, त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. यांना वातप्रकृतीचा त्रास होतो. पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. त्यांनी माणिक वापरायला हरकत नाही. 

२, ११, २० हे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना दु:खं पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही.

३, १२, २१, ३० या तारखांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लाभल्यावर सर्व क्षेत्रात त्यांची आघाडी दिसून येते. 

४, १३, २२, ३१ या तारखांचे लोक टोकाचे आस्तिक नाहीतर टोकाचे नास्तिक असतात. पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार त्यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे. 

५,१४,२३ जन्मतारिख असणारे लोक अतिशय हुशार असतात. परंतु, हे लोक पटकन नाराज होतात. त्यांना अपमान सहन करता येत नाही. सतत सर्दीने बेजार असतात. त्यांचा स्वामी आहे बुध आणि बुधाचे रत्न आहे पाचू. अशा लोकांनी पाचू धारण करण्याआधी तो नीट पारखून घ्यावा. या जन्मतारखेच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडावी. तसेच त्यांना कायदेविषयातही गती प्राप्त होईल. 

६,१५,२४ जन्मतारिख असणारे लोक राजेशाही असतात. उच्च राहणीमान त्यांना आवडते, मात्र कामाच्या बाबतीत अतिशय आळशी असतात. छोटेसे काम करायलाही पुष्कळ विलंब लावतात. एखाद दिवशी काम करतील, तर दुसऱ्या दिवशी अजिबात काम नाही, एवढा सुस्तपणा त्यांच्यात असतो. या स्वभावात भर म्हणजे, चटपटीत आणि गोड पदार्थांचे सेवन त्यांना आणखी आळशी बनवते. परंतु या तारखेचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सौंदर्याचा उपासक आहे. त्यामुळे आळशी असूनही या लोकांमध्ये नीटनेटकेपणा आणि शानशौकीची आवड दिसून येते. शुक्राचे रत्न हिरा आहे. तो परिधान केला असता, या लोकांचे भाग्य हिऱ्यासारखे उजळते. 

७,१६,२५ या जन्मतारखेच्या व्यक्ती पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेल्या आहेत. चविष्ट पदार्थ आवडतात. वयाच्या ३५ नंतर पोटाचे त्रास. त्यांना अनेक स्वप्न पडतात, त्यापैकी अनेक स्वप्न खरी होतात. लागणे, भाजणे, चिरणे या गोष्टी वारंवार घडतात.

८,१७,२६ जन्मतारिख असणाऱ्या लोकांचा स्वामी शनि आहे आणि शनिचे रत्न निलम आहे. या लोकांच्या वाट्याला बालपणापासून दुखापती फार. गुडघेदुखी, पायदुखी, डोकेदुखीचे सतत त्रास होतात. हे हाडाचे इंजिनिअर असतात. तंत्र, यंत्र, उपकरण, स्थापत्य, अभियंता होतात.

९,१८,२७ जन्मतारिख असणारे लोक मंगळाच्या प्रभावाखाली असतात. मंगळाचे रत्न पोवळे आहे. त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. त्यांनी पोवळ्याचा वापर केला पाहिजे. कोणत्याही मंगळवारी पोवळे धारण करावे. पोवळे देवीचे रत्न आहे. सर्व भगिनींनी त्याचा वापर करावा, अवश्य लाभ होता़े युद्ध, पराक्रम, भांडण यांचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे हे लोक नेहमी नेतृत्वात पुढे असतात. त्यांच्या ठायी पराक्रम असतो, परंतु त्यांनी भावनांवर, रागावर आवर घालण्यासाठी पोवळ्याचा वापर करावा. 

टॅग्स :Annasaheb Moreअण्णासाहेब मोरे