शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाहेच्या जेवणात मिळत नाही, ती तृप्तता घरच्या जेवणात का मिळते माहितीय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:42 IST

फास्ट फूडच्या जमान्यातही घरचा डाळ भात खाल्ल्यानंतर 'अन्न हे पूर्णब्रह्म' का जाणवतं, चला जाणून घेऊ. 

रोजच्या जेवणाचा कंटाळा म्हणून चवबदल म्हणत आपण हॉटेलिंग करतो. बाहेर गेलो की फास्ट फूड, जंक फूड खातो. मित्रांबरोबर पिझ्झा, पास्ता, सॅन्डविचच्या पार्टी करतो. तोवर घरच्या अन्नाची किंमत कळत नाही. पण जेव्हा मेसचे जेवण, परदेशी गेल्यावर रोजचे हॉटेलचे जेवण, खाणावळीतला डबा खाण्याची वेळ येते किंवा आठ दहा दिवस घराबाहेर असल्यावर बाहेरच्या जेवणावर गुजराण करावी लागते, तेव्हा घरच्या अन्नाची किंमत कळते!

घरचे आणि बाहेरचे जेवण यात फरक काय? दोन्ही कडे पोटभरीचे अन्न मिळते. परंतु बाहेरच्या जेवणाने रसना तृप्ती अर्थात जिभेचे चोचले पुरवले जाऊ शकतात, मात्र घरच्या जेवणाने मनाला तृप्ती येते. बाहेरच्या जेवणाने तात्कालिक समाधान वाटत असले, तरी पुढच्या दोन तासात पुन्हा भूक लागते. सोडा किंवा बटाटा,चीज, अतिरिक्त साखर यांचा वारेमाप समावेश केल्यामुळे ते अन्न पोटभरीचे ठरू शकत नाही. याउलट घरी नाश्त्यात एक पोळी/चपाती खाल्ली तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही. एवढा का बरं फरक पडत असेल?

तर फरक आहे, बनवणाऱ्या हातांचा! घरचा स्वयपांक करणारी गृहिणी घरच्यांच्या प्रेमापोटी तो स्वयंपाक करत असते. तो करताना तिचा उमाळा, आपुलकी, प्रेम त्या स्वयंपाकात उतरते. त्यामुळे तो स्वयंपाक पौष्टिक आणि रुचकर होतो. हॉटेलमधला स्वयंपाकी काम उरकत असतो. त्या पदार्थाच्या चवीशी, त्याच्याशी निगडित स्वच्छता, आरोग्य याच्याशी त्याचा संबंध नसतो. गृहिणी मात्र प्रत्येक गोष्ट निवडून घेतला. प्रेत्यक जिन्नस डोळ्याखालून घालतात. घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करतात. त्यामुळे तो स्वयंपाक सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आणि अंगी लागतो. 

जेवण करणाऱ्याबरोबर वाढपी देखील महत्त्वाचा असतो. आता बुफे पद्धत आली. पूर्वी पंगती असत. पंगतीतले वाढपी आठवून बघा, झरझर वाढून पुढे निघून जात असत. त्या वाढण्यात आपुलकी नसल्यामुळे वाढणार्याचे भाव अन्नात उतरतात. लोक रुक्षपणे वाढतात, जेवणारे रुक्षपणे जेवतात. घरी आई, आजी, ताई, बायको, आत्या, मावशी, आग्रह करून जेवायला वाढतात. तो आपुलकीचा भाव नसेल तर घरच्या स्वयंपाकात आणि मेसवरच्या जेवणात काय फरक उरणार? 

आपला शरीर यज्ञ चालत राहावे, यासाठी अन्नाची आहुती देहात टाकली जाते. 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' अशी ओळ 'वदनी कवळ घेता' या श्लोकात दिल आहे त्याच्या अर्थाला जागून थोडंच, पण रुचकर अशा घरच्या जेवणाचा आस्वाद घेऊया आणि पुढच्या पिढीलाही घरच्या जेवणाचे महत्त्व पटवून देऊया! शिवाय, अन्न घरचे असो नाहीतर बाहेरचे ते वाया जाणार नाही, फेकून द्यावे लागणार नाही, त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊया!

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स