शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात घंटानाद का करावा आणि कितीदा करावा? जाणून घ्या त्यामागील शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:00 IST

कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. मग तो कितीदा आणि का करावा ते वाचा.

रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जावे, असा आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. रोज सकाळी मंदिरात जाणे शुभकारक असते. ही वेळ शांततेची असते. सभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. पवित्र असते. अशा मंगलसमयी मंगलदर्शनाने दिवसाची सुरुवात केली असता दिवस छान जातो. म्हणून रोज सकाळी मंदिरात जाण्याचा शिरस्ता ठेवावा.

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून, पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी व कोणासाठी? घंटानाद देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या भक्ताकडे त्याची दृष्टी जाते. या दृष्टीच्या तेजामुळे दृष्ट प्रवृत्ती नष्ट होते. आगमनार्थं तु देवानां गमनाथरं तु राक्षसाम् ।कुर्वे घण्टारवं ततर देवताहृान लक्षणम् ।।

अनग्राहक देवांच्या आनगमासाठी व प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आवाहनाचे उपलक्षण आहे. घंटानाद एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेतो अशी भक्तांची श्रद्धा असते.

घंटानाद झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून मस्तक नत करून म्हणजेच झुकवुन नमस्कार करावा. नमस्कार तीन प्रकारे केला जातो. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा आपल्या देहाचे आठ अवयव जमीनिला लागतात, त्याला अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवाच्या चरणांवर अथवा देवासमोर नतमस्तक करणे हा कायिक नमस्कार झाला. वाचेने देवाचे नामस्मरण करणे, जप जाप्य करणे, मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे याला वाचिक नमस्कार म्हणतात. मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्यारंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावर शक्यतो कायिक नमस्कार करावा. 

जो देव आपल्या आवडीचा असतो, त्याची प्रार्थना करावी. आपल्या आवडत्या दैवताचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ ओढावी. देवाचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांतचित्ताने बसावे. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक असते, हा विचार कायम ध्यानात ठेवावा.