शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

'उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी' असे का म्हणतात? वैभवलक्ष्मी व्रताच्या निमित्ताने जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 08:00 IST

मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठव करून दिला आहे.

दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. म्हणून पाश्चात्य संस्कृतीत 'गुड मॉर्निंग' म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचेच अनुकरण म्हणून आपल्याकडेही 'राम राम' ऐवजी 'सुप्रभात' म्हटले जाते. मात्र, दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. तो विचार आपल्या विस्मृतीत जाऊ नये, म्हणून ही उजळणी. शिवाय आजपासून मार्गशीर्ष गुरुवारचे वैभवलक्ष्मी व्रत देखील सुरू होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पूजेला या माहितीचीही जोड हवीच!

पाच इंचाचा मोबाईल हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडला. आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वत:चे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करून घेऊ लागला. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाइलरूपी जग हातात घेण्याआधी हा श्लोक म्हणा, मग जगाला सामोरे जा. 

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे. 

उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला, तर आपल्या लक्षात येईल, की लक्ष्मी, विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे, ही मानवाच्या हातातली, म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरूरी आहे. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे. 

मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने दिवसाच्या सुरुवातीलाच तो आठव करून दिला आहे. 'तूज आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी।' आपल्या हातात सर्वस्व सामावले आहे. सगळा पुरुषार्थ आपल्या हातांमध्ये आहे. हाच हात कोणावर उगारला, तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो, मात्र चांगल्या कामासाठी हातभार लावला, तर पुरुषार्थ वाढतो. 

एखादा रिकामा मनुष्य 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' अशी अपेक्षा करत असेल, तर तो आयुष्यभर रिकामाच राहील. त्याला कोणीही किंमत देणार नाही. भगवंत तरी आणखी काय काय देणार? दोन हात, दोन पाय, ज्ञानेंद्रिय, कमेंद्रिय, बुद्धी, मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य रडत राहतो. भगवंताने मला काय दिले? हिच जाणीव होण्यासाठी `प्रभाते करदर्शनम्'

'उद्योगाचे घरी, लक्ष्मी पाणी भरी' असे म्हटले जाते. एका जागी बसून, दुसऱ्यांच्या सुखाशी, यशाशी तुलना करून आपल्याला यश मिळत नाही. मिळते ती फक्त निराशा. ईशकृपेने सिद्धी अवश्य मिळते. परंतु, त्यासाठी प्रयत्नांची शर्थ मनुष्यालाच करावी लागते. 

लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली, की व्यक्ती रसातळाला जाते. हीच बाब `गृहलक्ष्मी'च्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही, त्या घरात  शांतता, सुख, समृद्धी नांदत नाही. 

हातात प्रचंड शक्ती आहे. `हिम्मते मर्दा तो मददे खुदा' असे म्हणतात. संकटाशी `दोन हात' करायचे, की पळ काढायचा, हे मनुष्याच्या `हाती' आहे. ही जाणीव होण्यासाठी, `प्रभाते करदर्शनम्' 

देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि चैतन्यमूर्ती गोविंद सर्वांना प्रसन्न होवो, म्हणून या क्षणापासून म्हणा, 'कराग्रे वसते लक्ष्मी....!'