शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:59 IST

हनुमंत नेहमी राम कार्यासाठी तत्पर असतात, मग निद्रा अवस्थेतील मंदिर उभारण्याचे कारण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते!

काही प्रचलित समजुतींमागचे कारण जाणून न घेताही आपण पालन करतो, त्यामागे सद्हेतू असणार हा भाव ठेवून आपण त्या करतो. जसे की रात्री केस कापू नये, नखे कापू नये, केर काढू नये, झाडांना हात लावू नये इ. त्यामागे निश्चितच काही ना काही कारणे आहेत, परंतु ती जाणून न घेता केवळ अंधानुकरण करणे योग्य नाही. एखाद्या कृतीमागे असलेला हेतू कळला तर ज्ञानात तर भर पडतेच शिवाय आपण जे करतो, वागतो ते समजून उमजून केल्याने आनंद दुणावतो. अशाच कृतींपैकी एक म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये! आता ही केवळ प्रथा आहे की त्यामागे काही कारण, चला जाणून घेऊ. 

काही गोष्टींचा संबंध थेट पौराणिक कथांशी जोडला जातो. ते विचार तर्क सुसंगत असतील तर पटतातही. काही पौराणिक कथा या रूपकात्मक असल्याने त्यातून मनुष्याने बोध घ्यावा हा हेतू असतो. झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये हे सांगण्यामागे महाभारताच्या कथेशी संबंध जोडण्यात आला आहे. ती कथा आणि त्याच्याशी संबंधित तर्क पडताळून पाहू. 

महाभारतात काय सांगितले आहे?

महाभारताच्या कथेनुसार, भीमाचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमंताला आज्ञा दिली. हनुमंतांनी वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या शेपटीने भीमाचा मार्ग अडवला. आपले शरीर थकल्याने आपल्याला हलताडुलता येत नाही, त्यामुळे तूच मदत कर असे हनुमंतांनी भीमाला सांगितले. भीमाची वाट अडवल्याने त्याला वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला. पण काही केल्या त्याला तसे करणे शक्य होईना. हनुमंताने पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेव असे सांगितले. भीमाने तसे केले पण त्याला तेही जमले नाही. तेव्हा हे वानर असाधारण व्यक्तिमत्त्व असल्याचे भीमाला कळून आले आणि त्याचे गर्वहरण झाले. 

भीम त्या वानराला शरण आला आणि हनुमंताने आपले रूप टाकले आणि मूळ रूप प्रगट केले. ते पाहता भीम हनुमंतासमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या अहंकाराची कबुली दिली. त्यावर हनुमंत म्हणाले, 'भीमा आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुबळे समजण्याची चूक करू नये. शिवाय एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, वैचारिक रित्या ओलांडून जाणे हा तिचा अपमान आहे हे लक्षात ठेवावे. म्हणून व्यक्ती झोपलेली असली, वयाने लहान असली तरी तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे, हे लक्षात घेऊन तिला ओलांडण्याची चूक करू नये!'

हनुमंताचे हे बोलणे ऐकून भीमाने ही खूणगाठ बांधली आणि त्यानंतर तो कधीच कोणाला ओलांडून गेला नाही. त्याने आपला अनुभव आपल्या भावंडाना सांगितला, त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचे अनुकरण लोक करू लागले व ती प्रथा बनत गेली. 

अशा रीतीने ही पौराणिक कथा या रीतीमागची पार्श्वभूमी तर सांगतेच शिवाय त्यामागच्या तर्काचाही खुलासा करते. त्यामुळे यापुढे झोपलेली व्यक्ती पाहिल्यावर तिला ओलांडून तर जाऊ नयेच, शिवाय तिचा आदर का करावा हेही लक्षात ठेवावे! याच गोष्टीचे स्मरण म्हणूनही भारतात अनेक ठिकाणी सुप्तअवस्थेतील हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घडते!

यामागे आणखीही अनेक आख्यायिका सांगितल्या जातात,त्यातील एक पुढीलप्रमाणे-

भद्रा मारुती मंदिरात हनुमानाची मूर्ती झोपलेल्या स्थितीत असण्याबद्दल अनेक समजुती आहेत. पण यातील सर्वात प्रसिद्ध राजा राजशी भद्रसेनची कथा आहे. राजा राजशी भद्रसेन तलावाच्या काठी हनुमानाची गाणी म्हणत असे म्हणतात. एके दिवशी हनुमान तेथे प्रकट झाले आणि राजाची गाणी ऐकू लागले. गाणे ऐकत हनुमानाला झोप लागली. तेव्हापासून येथे हनुमानाची मूर्ती पडलेल्या अवस्थेत आहे.

टॅग्स :Mahabharatमहाभारत